फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

“पालकमंत्री नव्हेत; मालकमंत्री झालेत“

“पालकमंत्री नव्हेत; मालकमंत्री झालेत“

प्रतिनिधी, पिंपरी : आज कितीतरी आमदारांना झोपा लागणार नाही. त्यात तुमचाही आमदार आहे. महायुती सरकारला चले जाव म्हणायची हीच ती वेळ आहे. त्यामुळे शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. सध्याचं सरकार योजनांची पुंगी वाजवून नागोबाला खुश करण्याचं प्रयत्न करत आहे. पालकमंत्री त्या त्या जिल्ह्याचे मालकमंत्री झाले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार होतोच कसा. त्यावर चौकशी कधी लावणार, असा प्रश्न खासदार अमोल कोल्हे यांनी भोसरीतील सभेत व्यक्त केला.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्या दिवसाचा समारोप भोसरीत झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, युवकाध्यक्ष महेबूब शेख, खासदार अमोल कोल्हे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, रविकांत वरपे, शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी महापौर आझम पानसरे, मोहिनी लांडे, महिलाध्यक्ष ज्योती निंबाळकर, अजित गव्हाणे, शहर युवकाध्यक्ष इम्रान शेख आदी उपस्थित होते.

डॉ अमोल कोल्हे म्हणाले, १५ लाखावरून सुरवात झालेले सरकारचे वादे पंधराशे रुपयांवर येऊन थांबले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात साडे चार हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्याचे पुढे काय झाले. अर्बन स्ट्रीट फुटपाथच्या नावाखाली २५० कोटी, २०० कोटी, भोसरीच्या पुलाखाली ४० कोटीं रुपये उधळले, त्यामुळे करदात्यांच्या पैशांचा चुराडा केला आहे. नमामी इंद्रायणीच्या नावाखाली एसटीपीत पाणी प्रक्रिया न करताच सोडले कसे जाते, याचे उत्तर दिले पाहिजे.’

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली खरी पण योजनेपेक्षा प्रसिद्धी वर सरकार खर्च जास्त करत आहे. सरकारने योजना पोहचविण्याऱ्या दूतांवर ३०० कोटी आणि प्रसिद्धीवर २७० कोटी खर्च केला आहे. आता ‘रामा’ही त्यांची लबाडी कळली आहे. त्यामुळे रामही आमच्या पालखीत येऊन बसला आहे.”

शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले, महापालिकेत प्रशासकीय राजवटीतही मोठ्या प्रमाणावर गैर कारभार सुरू आहे. सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे शहरांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. शहराचे महायुतीच्या कारभाऱ्यांनी दोन तुकडे केले आहेत. महापालिकेच्या माध्यमातून शहराचे लचके तोडण्याचे काम सुरू आहे. हे चित्र आपल्याला बदलायचे आहे.अजित गव्हाणे यांच्यासारख्या व्यक्तिमत्वामुळे पक्षाची ताकद आता आणखी वाढणार आहे.

अजित गव्हाणे म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेतही प्रचंड भ्रष्ट्राचार झाला. याला शहरातले तीनही आमदार जबाबदार आहेत. शहरात परिवर्तन करायचा आहे. औद्योगिक नगरी म्हणून ओळख निर्माण केली. मात्र, ही ओळख पुसण्याची ओळख विरोधक करत आहेत. भोसरी विधानसभा मागे राहिला त्याला विद्यमान आमदार कारणीभूत आहेत. आमचा व्यवसाय हा राजकारण नाही. मात्र काहीजणांनी राजकारणाचा व्यवसाय केला. त्यामुळे शहर तुंबले. त्याचा त्रास नागरिकांना झाला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"