डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चिखलीत कार्यक्रम

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्ञानसागर इंग्लिश मिडियम स्कूल चिखली यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
अभिवादन कार्यक्रम प्रमुख उपस्थितीमध्ये रयत विद्यार्थी विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे,प्रदेश महासचिव संतोष शिंदे,राज्य समन्वयक श्वेता ओव्हाळ, श्रीयश कदम उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे व प्रदीप रॉय यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांशी मनोगत व्यक्त करताना धम्मराज साळवे यांनी सांगितले की “डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थिती मध्ये संघर्ष करत शिक्षण पूर्ण केले व या देशाचे संविधान लिहण्याची संधी निर्माण केली.आजच्या विद्यार्थ्यांनी हाच आदर्श घेत परिस्थितीचे कारण पुढे न करता यश मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.”
यावेळी प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांनी असे मत व्यक्त केले की स्वतःमध्ये चांगला विद्यार्थी घडवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने बाबासाहेबांचे जीवन चरित्र वाचले पाहिजे. राज्य समनव्यक श्वेता साळवे यांनी असे मत व्यक्त केले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नव्हे तर देशातील सर्व भारतीयांचे उद्धारकर्ते आहेत.इथल्या व्यवस्थेने केवळ चूल आणि मूल एवढ्यापुरते मर्यादित ठेवलेल्या माझ्यासारख्या अनेक महिलांना बाबासाहेबांनी दिलेल्या संविधनामुळे स्वप्नांची गगनभरारी घेता येते. यावेळी धम्मराज साळवे,संतोष शिंदे,श्वेता ओव्हाळ, श्रीयश कदम,शाळेचे शिक्षक प्रदीप रॉय,मुख्याध्यापिका अबोली तापकीर,अनिता हुकेरी, प्रमिला वाघमारे,उषा मिसाळ,पूनम मौर्य,वंदना रणदिवे,वृषाली नोराड,दिपाली कदम,करुणा गायकवाड इ.उपस्थित होते.