फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
क्रीडा देश विदेश

अर्जुन पुरस्कार प्राप्त धावपटू कविता राऊत यांचा सरकारवर गंभीरआरोप

अर्जुन पुरस्कार प्राप्त  धावपटू कविता राऊत यांचा सरकारवर गंभीरआरोप

नाशिक : सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिंपिक धावपटू कविता राऊत यांनी आपल्यावर आदिवासी असल्याने अन्याय होत असून राज्य सरकारच्या नोकरीसाठी गेल्या 10 वर्षा पासून डावलले जात असल्याचा आरोप माध्यमांशी बोलतांना केला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

राऊत म्हणाल्या की,मी आदिवासी असल्याने माझ्यावर अन्याय होत असून राज्य सरकारच्या नोकरीसाठी डावलले जात आहे . सरकार दुजाभाव करत आहे. आदिवासी असल्यामुळे जातीला मध्यस्थी ठेवून जातीची शिकार मी झाली आहे, आदिवासी असल्याने मला शासकीय नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. शासकीय धोरणांनुसार नोकरीसाठी अनेकदा मी अर्ज देऊनही माझ्या अर्जांकडे जाणूबूजून दुर्लक्ष केले जात आहे, माझ्यापेक्षा कमी गुण आणि खेळात कमी श्रेणी असलेल्या खेळाडूंना मात्र, सहज शासकीय नोकरी देण्यात येत आहे”, असे कविता राऊत यांनी म्हटले.

कविता राऊत म्हणाल्या की, माझ्या पाठीशी कुणीही गॅाड फादर नसल्याने १० वर्षांपासून मला राज्य सरकारी नोकरीत डावलले जात असून २०१४ ते २०२४ असे दहा वर्ष मी मंत्रालयात चक्कर मारत आहे.मात्र, अजूनही माझे काम होत नाही. राज्य सरकारी नोकरीसाठी दहा वर्ष का लागले याचे उत्तर सरकारने द्यावे? असा सवाल उपस्थित करत कविता राऊत यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
नाशिक येथील आदिवासी विकास भवन येथे मागील ४ दिवसांपासून आदिवासी उमेदवारांचे पेसा पदभरतीवरून आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला कविता राऊत यांनी भेट दिली असता या आंदोलनातच माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"