शाळांमध्ये सीसीटिव्ही सक्तीचे

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : बदलापूरमधील बालिकांवरील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शाळांमध्ये सीसीटिव्ही बसवणे, त्याच्या फुटेजची नियमित तपासणी करणे, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना काटेकोर पडताळणी केली पाहिजे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
प्रत्येक शाळेत लैंगिक छळाच्या तक्रारींसाठी विशाखा समितीच्या धर्तीवर आठवडाभरात विद्यार्थी समिती गठित करावी, असेही सांगण्यात आले आहे. शाळांनी आठवड्यातून तीन वेळा फुटेजची पाहणी करणे, सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, शाळेत अनुचित प्रकार घडल्यास २४ तासाच्या आच संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना माहिती द्यावी. माहिती लवपून ठेवल्यास संबंधित संस्थेवर गंभीर कारवाई करण्यात येईल. कोणत्याही आक्षेपार्ह बाबी आढळल्यास प्रशासनाच्या मदतीने तत्काळ कारवाई करावी, असे सांगण्यात आले आहे.