फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
पुणे

मावळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला!

मावळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला!

दोघांचा मृत्यू ,20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती
पिंपरी : रविवारची सुट्टी साधून पर्यटन स्थळ असलेल्या कुंडमळा येथे पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती . या गर्दीमुळे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे .मावळ तालुक्यातील इंदोरी गावानजीक असलेल्या कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील जुना झालेला पूल पर्यटकांच्या ओझ्यामुळे तुटून नदीत कोसळला . या दुर्घटनेमुळे वीस ते पंचवीस जण नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे . आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह मिळाले असून सुमारे 32 जण जखमी झाली आहेत.

त्यात सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले .या दुर्घटनेत काही लहान मुलेही वाहून गेल्याचे समजते .मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे .मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरातील अनेक पर्यटन स्थळावर जाण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे ,त्यामुळे या कुंडमळा परिसरात पर्यटकांची संख्या शनिवार-रविवार सुट्टी असल्याने वाढली होती .त्यातच गेल्या तीन चार दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्याने इंद्रायणी नदी दुधडी वरून वाहत आहे .
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत .कुंडमळा नदी ओलांडण्यासाठी एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी हा पूल आहे .या दुर्घटने नंतर एन डी आर एफ चे पथक मदतीसाठी दाखल झाले आहे .

viarasmall
viarasmall

मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी केले दुःख व्यक्त
तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे.

6 जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"