फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

रेल्वे दुर्घटना पाच प्रवाशांचा मृत्यू !

रेल्वे दुर्घटना पाच प्रवाशांचा मृत्यू !

मुंबई : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आज नऊ जून सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना घडली .दोन लोकल गाड्या एकमेका जवळून जाताना फूटओव्हर वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना घासून प्रवासी रेल्वे ट्रॅक वर पडले .आतापर्यंत पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून आठ प्रवाशी जखमी आहेत अशी माहिती सांगण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली .जखमी प्रवाशांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लोकल मधून प्रवासी फूटओव्हर वरून प्रवास करत होते .,एका ट्रॅकवरून सी एम टी कडे लोकल जात होती तर दुसऱ्या ट्रॅकवरून कसाऱ्याच्या दिशेने लोकल जात होती..यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येतआहे. त्यावेळी दोन्ही लोकलमधील दरवाजावरील प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली गेली सकाळी साडेनऊ वाजता ही दुर्घटना घडली. मुंब्रा आणि दिवा दरम्यान ही घटना घडली आणि डाऊन लोकल दरम्यान फूट ओव्हरवरून हे प्रवासी प्रवास करत होते.

viarasmall
viarasmall

त्यामुळे हा अपघात झाल्याची चर्चा आहे. सकाळी कामावर जाणाऱ्या कामगार वर्गांना हा अनुभव नवीनच होता., रेल्वेच्या दारामध्ये उभे राहून प्रवासी प्रवास करतात , प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येते याबाबत रेल्वे प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे. आता लोकल गाड्यांना देखील स्वयचलित दरवाजा बसवण्याबाबत विचार केला जात आहे. प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून लोकल ट्रेन मध्ये प्रवाशांची गर्दी नेहमीचअसते. यामुळे प्रवासी दाराच्या हँडलला लटकून प्रवास करतात हे धोकादायक आहे.गेल्या 20 वर्षात 51 हजार प्रवाशां आपले जीव गमावले आहेत असे 2024 मध्ये उच्च न्यायालयात सांगण्यात आले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"