राज्यभरात परतीच्या पावसामुळे नुकसान

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : परतीच्या पावसाचा जोर आता काहीसा ओसरला आहे. मुंबईत सकाळी अकरा वाजल्यापासून मुसळधार पाऊस झाला. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आहे.
राज्यभरात परतीच्या पावसाने गेले चार दिवस थैमान घातले होते. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरात पावसाने अक्षरशः झोडपून काढले. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचा इशारा महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाकडून देण्यात आला होता. पुणे, मुंबईमधील शाळांना देखील गुरुवारी सुटी जाहीर करण्यात आली. या परतीच्या पावसामुळे राज्यभरात ठिकठिकाणी नागरिकांचे नुकसान झाले आहे. वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्या. पुण्यात ३५ मिनिटांच्या प्रवासाला नागरिकांनी चार तास खर्च केल्याचा अनुभव काहींनी सांगितला आहे. एकूण परतीचा पाऊस अनपेक्षितपणे झोडपून गेल्यामुळे व्यवस्था कोलमडीस आल्या.
मुसळधार पावसामुळे मक्याचे पीक जमीनदोस्त
परतीच्या पावसामुळे धुळे शहरासह धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मक्याच्या शेतात गुडघ्यावर पाणी साचले. तालुक्यातील देवभाने शिवारातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मका पीक लावला होता. परंतु पावसामुळे तो पूर्णपणे ओला झाला आहे. सुमारे तीन एकर क्षेत्रामध्ये मक्याची लागवड केली होती. शेतकऱ्याचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.
अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर टँकर उलटला
अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी येथे कच्च्या तेलाची वाहतूक करणारा टँकर उलटला. यामुळे गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर वाहतूक कोंडी झाली. गुजरातकडे जाणारा हा टँकर चालकाचं नियंत्रण सुटले. त्यामुळे महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर कच्चा तेलाची गळती झाली. गळती सुरू असतानाच काही नागरिकांसह चालकांनी देखील गळती सुरू असलेलं तेल आपल्या मिळेल त्या वस्तूमध्ये घेण्यासाठी देखील गर्दी केसी. मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक एकाच मार्गिकेवरून धीम्या गतीने होती. स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि टँकर बाजूला सारून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.