मुंबईत पुन्हा एक बोट दुर्घटना

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटा केव्ह्जला जाणाऱ्या प्रवासी बोटीच्या अपघाताची बातमी ताजी असतानाच आणखी एक बोट दुर्घटना घडली आहे. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मालाडच्या मढ जवळ मच्छिमारांची मच्छिमारांची बोट ही मालवाहू जहाजाला धडकल्याचे उघडकीस आले. शनिवारी (२८ डिसेंबर) रात्री उशिरा हा अपघात झाला असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मालाड पश्चिमेतील मढ कोळीवाडा परिसरातील ग्रामस्थ हेमदीप हरिश्चंद्र टिपरी हे नेहमीप्रमाणे मासेमारी करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी खोल समुद्रात गेले असता या मासेमारी नौकेला चिनी मालवाहू जहाजाने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, त्यांची नौका समुद्रात बुडाली. यामधील तांडेल, खलाशी यांना बाजूला असलेल्या सवटी ग्रुपच्या नौकांनी सुखरुप बाहेर काढले. तसेच, याच ग्रुपच्या ८ बोटींनी नौका बांधून आणली. हे जहाज बंदरावर आणण्यासाठी कोस्ट गार्डचे जहाज सोबत होते. तसेच, दोन अधिकारी शनिवारी रात्रीपासून दोन अधिकारी नौकांवर मदत करत होते.
काही दिवसांपूर्वी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ दुपारी एलिफंटाच्या दिशेने जाणाऱ्या नीलकमल या प्रवासी बोटीला भारतीय नौदलाच्या वेगवान स्पीड बोटने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे प्रवासी बोटीला भगदाड पडून ती पाण्यात बुडाली आणि त्यात १५ जणांचा मृत्यू झाला होता.