मैत्र जीवांचे म्हणजे महेशदादा लांडगे

- हभप पुरुषोत्तम पाटील महाराज
राजकारणापलीकडची मैत्री जपणारा, मित्रांसाठी धावून येणारा सच्चा मित्र असे वर्णन भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांचे करता येईल. ”आपुलिया हिता असे जो जागता, धन्य तयाचे माता पिता” हे वचन दादांठायी सार्थ ठरते. वारकरी संप्रदायातील महेश दादांच्या योगदानाविषयी पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी जीवनात आलेले अनुभव आणि किस्से सांगितले.
मैत्रीचा अनुबंध उघडताना पुरुषोत्तम महाराज पाटील म्हणाले, ‘ महेशदादा लांडगे हे जरी आज आमदार असले तरी त्यांची आणि माझी मैत्री ही पंधरा ते वीस वर्षांपासून आहे. केवळ मैत्री नव्हे तर कौटुंबिक स्नेह आहे. महेश दादांनी वारकरी संप्रदायासाठी अनमोल असे योगदान दिलेला आहे. त्याची अनेक उदाहरणे देता येतील. भोसरी मध्ये शिवरात्रीनिमित्त दरवर्षी महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन च्या वतीने शिवरात्री कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जाते या आयोजनाच्या सहभागामध्ये त्यांनी मला सहभागी करून घेतलं होतं आणि आम्ही राज्यातील मोठमोठ्या कीर्तनकारांना आमंत्रित करून त्यांची कीर्तन सेवा घडवून आणली होती. मग त्यामध्ये हभप बाबा महाराज सातारकर, ढोक महाराज चैतन्य महाराज अशा अनेक महाराजांची किर्तन सेवा या महोत्सवात झालेली आहे. त्याचबरोबर मध्यंतरीच्या कालखंडामधें आयोध्येत राम मंदिराची निर्मिती होत असताना या मंदिराच्या निर्मितीसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी महेश दादांनी योगदान दिले. परिसरामध्ये अनेक ठिकाणी मंदिरे उभारण्यासाठी दादांनी मदतीचा हात दिला आहे. त्यातून वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्म संस्कृती वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. ”
देहू आळंदीच्या विकासासाठी सदैव कार्यरत!
धार्मिक कार्याला मदत करणं हा महेश दादांचा गुण भावना आहे असे सांगून पुरुषोत्तम महाराज पाटील म्हणाले, देहू आळंदी हे क्षेत्र मतदार संघात नसली तरी केवळ वारकरी संप्रदायाच्या प्रेमाखातर महेश दादांनी या दोन तीर्थक्षेत्रांसाठी निधी उपलब्ध करून देणे व तेथील विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आळंदी मधील जोग महाराज संस्थेच्या जागेच्या आरक्षणाचा एक प्रश्न होता. तो प्रश्न महेश दादांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न केला. शहराच्या सीमेवरून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या संवर्धनासाठी विकास आराखडा तयार करणे त्याचबरोबर नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी आवाज उठवला होता. त्याचा परिपाक म्हणजेच नदी सुधार प्रकल्पाला गती मिळाली आहे राज्य शासनाकडून पर्यावरण विभागाची एनओसी मिळालेली आहे. दादांचे आणखी एक काम महत्त्वाचं काम म्हणजे त्यांनी श्रीक्षेत्र टाळगाव चिखली येथे संत तुकाराम महाराज संत पिठाची निर्मिती केली आहे या संत पिठाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे शिक्षण परंपरा याचे दर्शन आणि शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. या संस्थेत मोठ्या प्रमाणावर मुले वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत आहेत. ”
मैत्री जपणारा आणि मैत्रीसाठी जागणारा नेता!
राजकारण असो की समाजकारण, कला क्रीडा क्षेत्र, धर्मकारण असो की अध्यात्म अशा सर्व विभागांमध्ये सदोदित कार्यतत्पर राहणं, हा महेश दादांचा गुण भावनारा आहे, असे सांगून पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी महेशदादा लांडगे यांच्या यशाचे आणि लोकप्रियतेचे गमक सांगितलं.
पुरुषोत्तम महाराज पाटील म्हणाले, ”तरुणांमध्ये महेश दादा लांडगे यांची क्रेज आहे. सोशल मीडियावरही ते नेहमी सजग असतात. सदैव कार्य तत्पर असणं हा त्यांचा गुण सर्वांना भावना आहे. मैत्री जपणारा आणि मित्रांसाठी मदतीला जाऊन जाणारा हा आमचा मित्र आहे. मतदार संघातील छोट्या मोठ्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे, जो येईल त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणे, प्रश्न सुटेपर्यंत त्या प्रश्नांचा पाठपुरावा करणे हा महेश दादांचा गुण मला भावतो त्याचबरोबर लोकांशी असणारा कनेक्ट, संपर्क हेच त्यांच्या यशाचे गमक आहे.
राजकारणात पद प्रतिष्ठा मिळाल्यानंतर अनेकांची सर्वसामान्यांशी असणारी नाळ तुटते. मात्र, महेश दादांच्या बाबतीत याउलट आहे, आमदार झाल्यानंतर त्यांची नाव मतदारांशी लोकांशी अधिक घट्ट झाली आहे. या निमित्ताने मला एक किस्सा सांगावासा वाटतो. माझ्या एका मित्राच्या दुकानाचे उद्घाटन आळंदी येथे होतं खरे तर आळंदी हा दादांच्या कार्यक्षेत्रातील भाग नाही, मात्र केवळ माझ्या मैत्री खातर त्या कार्यक्रमाला आले. वारकरी संप्रदायातील जे अनेक छोटे-मोठे प्रश्न असतात. ते प्रश्न घेऊन आम्ही त्यांच्याकडे जात असतो, आणि ते मनापासून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ‘मैत्र जिवांचे, या नुसार मैत्री जपणारा हा आमचा मित्र आहे. त्याच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा त्यांना दीर्घायुष्य मिळो ही पांडुरंग चरणी प्रार्थना.