मातंग समाजाच्या पारंपरिक कलेला प्रोत्सहान हवे

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नांदेड : राज्यातील मातंग समाज आज खेड्यापाड्यात आपले पारंपरिक केरसुणी दोरखंड यासारखे व्यवसाय आज ही मोठ्या प्रमाणात करीत असून त्यांची उपजीविका त्यावर चालत आहे . समाजाच्या या पारंपरिक व्यवसायाला मदत आणि प्रोत्साहान मिळण्यासाठी आग्रह धरणार असल्याचे नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे यांनी जाहीर केले.
बहुजन संवाद यात्रेनिमित्त आमदार गोरखे हे आज नांदेड येथे आले होते त्यावेळी ते बोलत होते.मातंग समाजाच्या केरसुणी आणि दोरखंड यावर उजीविका असणाऱ्या कुटुंबीयांची गोरखे यांनी भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देण्याचे त्यांनी यावेळी आश्वासन दिले.
नांदेड शहरातील शांतीनगर व प्रीती नगर या दोन वसाहतींना भेट दिली. या भेटी दरम्यान समाजातील काही झाडू विक्रेत्यांची गोरखे यांनी भेट घेतली.स्थानिकांशी संवाद साधला व व्यवसायाबद्दल माहिती घेतली. वाडी वस्त्यांवर भेट दिली. यात प्रामुख्याने समाज मंदिर व घरकुलाच्या योजना कशा पोहोचवता येतील या अनुषंगाने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी माजी आमदार अविनाश घाटे, प्रमोद गायकवाड, सचिन गुंडाळे, रामप्रसाद कदम, उत्तम किसनराव गादगे, सतीश कावडे, गणपत गायकवाड, नागेश काजलापुरकर, राहुल तेलंग, डॉक्टर भगवान सूर्यवंशी, ॲड. ज्ञानेश्वर सूर्यवंशी, भारत दाढे आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रभर ही आमदार अमित गोरखे यांची बहुजन संवाद यात्रा चालणार आहे.