रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पिंपरी : रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचा ७ वा वर्धापन दिन आचार्य अत्रे रंगमंदिर,संत तुकाराम नगर पिंपरी या ठिकाणी उत्साहात साजरा झाला. संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात मनी अकॅडमी संचालक आकाश गोंदवले यांनी आर्थिक नियोजन कसे करावे यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या मुख्य सत्रामध्ये मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि महामानवांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . पांडुरंग भोसले ,माजी पाणीपुरवठा अधिकारी शरद जाधव प्रमुख उपस्थित होते,संस्थेचे अध्यक्ष धम्मराज साळवे हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते .
रयत विद्यार्थी विचार मंच संस्था शिक्षण, रोजगार,आरोग्य, क्रीडा,कला,महिला सक्षमीकरण या क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात २०१७ पासून कार्यरत आहे. या उभरत्या समाजाची उभारणी करणाऱ्यांच्या हातांना प्रोत्साहन व कौतुक म्हणून सलग दुसऱ्या वर्षी संस्था महाराष्ट्रातील १) प्रा. स्वामीराज भिसे यांना शिक्षण क्षेत्रातील कर्मवीर भाऊराव पाटील रयत गौरव पुरस्कार २) चंद्रकांत जगताप यांना रोजगार क्षेत्रातील रतन टाटा रयत गौरव पुरस्कार ३) डॉ.फैज सय्यद यांना आरोग्य क्षेत्रातील संत मदर तेरेसा रयत गौरव पुरस्कार ४) हर्ष राऊत व विजय कापसे यांना कला क्षेत्रातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रयत गौरव पुरस्कार ५) बुद्धभूषण गायकवाड यांना क्रीडा क्षेत्रातील खाशाबा जाधव रयत गौरव पुरस्कार ६) सायली धनाबाई यांना महिला सक्षमीकरण क्षेत्रातील जोती-साऊ रयत गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .