फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
देश विदेश

तुम्ही जाणता ध्वजारोहण, ध्वजवंदन यातील फरक?

तुम्ही जाणता ध्वजारोहण, ध्वजवंदन यातील फरक?

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क

देशाचा राष्ट्रध्वज हा सन्मान आणि अभिमानाचे प्रतीक आहे. दरवर्षी स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) आणि प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) रोजी ध्वज फडकवला जातो, परंतु या दोन्ही दिवशी राष्ट्रध्वज फडकविण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे, याची माहिती फार कमी जणांना आहे. किंवा हा फरक अनेकांच्या लक्षातही येत नाही.

या दोन्ही दिवशी पैकी एका दिवशी ध्वजारोहण केले जाते आणि एका दिवशी ध्वज केवळ फडकविला जातो. आता यापैकी ध्वज फडकवणे आणि ध्वजारोहण यात फरक काय ? तर ध्वज फडकवणे आणि ध्वजारोहण यात खूप फरक आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. त्यामागील कारणही वेगळे आहे. प्रजासत्ताक दिन अर्थात २६ जानेवारी रोजी राष्ट्रध्वज शीर्षस्थानी बांधलेला असतो आणि ते केवळ तेथून फडकवला जातो, याला ध्वज फडकवणे म्हणतात.

आता स्वातंत्र्यदिन अर्थात १५ ऑगस्ट विषयी सांगायचे तर, या दिवशी राष्ट्रध्वज वर नेऊन नंतर फडकवला जातो, याला ध्वजारोहण म्हणतात. कारण जेव्हा आपल्या देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटिश सरकारचा ध्वज उतरविण्यात आला आणि त्यानंतर भारताचा ध्वज उंचावर नेऊन फडकवण्यात आला होता. यामुळेच १५ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रव्जज वर खेचून फडकवला जातो.

कसे असतात दोन्ही दिवसांचे कार्यक्रम?
स्वातंत्र्य दिवस आणि प्रजासत्ताक दिन या दोन्ही दिवशी पंतप्रधान आणि राष्ट्रपती स्वतंत्रपणे ध्वज फडकवतात. स्वातंत्र्य दिनानिमित्त (१५ ऑगस्ट), पंतप्रधान कार्यक्रमात सहभागी होतात आणि ध्वजारोहण करतात. प्रजासत्ताक दिनी देशाचे राष्ट्रपती २६ जानेवारी रोजी मुख्य कार्यक्रमात सहभागी होतात. त्यानंतर ध्वजवंदन करतात.

ठिकाण कोणते असते?
स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या दिवशी पंतप्रधान ध्वजारोहण करतात. तर, कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम होतो. या दिवशी राष्ट्रपती ध्वज फडकवतात.

प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींचे महत्त्व काय?
प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला राष्ट्रपती ध्वज फडकवितात, या मागेही एक कारण आहे. आपले पंतप्रधान हे देशाचे राजकीय प्रमुख असतात तर राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख असतात. २६ जानेवारी १९५० रोजी देशाची राज्यघटना लागू झाली. याआधी देशात कोणतेही संविधान किंवा राष्ट्रपती नव्हते. त्यामुळे राष्ट्रपती दरवर्षी २६ जानेवारीला ध्वजवंदन करतात.

यंदा मंत्रालयात काय घडले?
यंदा राज्याच्या मंत्रालयाच्या राजशिष्टाचार विभागातील अधिकाऱ्यांना ध्वजारोहण आणि ध्वजावंदनचा अर्थच बदलून टाकला आहे. कारण, येत्या २६ जानेवारीला पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण करावं, असा शासन निर्णय मंत्रालयाच्या राजशिष्टाचार विभागाकडून काढण्यात आला आहे. मुळात १५ ऑगस्टला ध्वजारोहण केलं जातं, तर २६ जानेवारीला (Republic Day 2025) ध्वजवंदन केल जातं. मात्र मंत्रालयाच्या राजशिष्टाचार विभागाकडून काढण्यात आलेल्या शासन निर्णयात २६ जानेवारीला ध्वजावंदन ऐवजी ध्वजारोहण करावं असं स्पष्टपणे उल्लेख केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

चुकीचा आदेश व्हायरल
स्वातंत्र्यदिनाला (Independence Day) (१५ ऑगस्ट) तिरंगा स्तंभाच्या खालच्या बाजूस बांधला जातो. नंतर पंतप्रधान ध्वजाला दोरीने वर नेऊन मग फडकवतात. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या सन्मानार्थ ध्वजारोहण केले जातं. तर प्रजासत्ताकदिनाला (२६ जानेवारी ) (Republic Day 2025) ध्वज स्तंभाच्या वरच्या बाजूला बांधला जातो. त्यानंतर ध्वज केवळ फडकवला जातो. देश आधीच स्वतंत्र असल्याचा संकेत म्हणून ही कृती केली जाते. मात्र राजशिष्टाचार अधिकारी यांना याचा विसर पडला आहे की काय? असा प्रश्न या निमित्याने विचारला जाऊ लागला आहे. त्यामुळे आता ही चूक लक्ष्यात घेत यात बदल करून नवीन शासन निर्णय जाहीर केला जातो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"