फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

लोक रस्त्यावर आल्यावरच गांभीर्य कळते का?

लोक रस्त्यावर आल्यावरच गांभीर्य कळते का?

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : तीव्र जनसंतोष उफाळून येत नाही, तोपर्यंत आपल्याकडे व्यवस्था जागच्या हलत नाहीत. जोपर्यंत लोक रस्त्यावर उतरत नाहीत, तोपर्यंत गुन्ह्यांचा तपास गांभर्याने केला जाणार नाही का?, अशा शब्दात न्यायालयाने पोलिसांना जाब विचारला आहे.

बदलापूरमधील दोन बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती रेवती मोहिती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झालीय न्यावेळी न्यायालयाने बदलापूर पोलिसांनी तपासात केलेली कसूर दाखवत चुका अधोरेखित केल्या. सरकारी पक्षाकडून वकील हितेन वेनेगावकर यांनी बाजू मांजली. त्यांना न्यायालयाने अत्यंत कठोर शब्दात सुनावले आहे. अगदी चार वर्षाच्या मुलीसुद्धा अत्याचाराला बळी पडत आहेत. हे प्रचंड धक्कादायक आहे. ही काय परिस्थिती उद्भवली आहे? अद्याप एकाच पीडितेचा जबाब कसा नोंदविला? दुसऱ्या पीडितेचा जबाब का नोंदविला नाही? असं न्यायमूर्तींनी विचारलं. आज हा जबाब नोंदविला जाईल, असं बचाव पक्षाने सांगितले.

ज्या क्षणी पीडित मुलीच्य कुटुंबियांनी तक्रार दाखल केली, त्याच क्षणी शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करायला हवा होता, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. शाळेतच जर मुली सुरक्षित नसतील तर त्या शिक्षणाधिकाराचा उपयोग काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

बदलापूरमध्ये एका शिक्षण संस्थेतील दोन बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर मोठा जनक्षोभ उसळला होता. गुन्हेगाराला फाशीच झाली पाहिजे, अशी मागणी करीत शाळेतील पालकांनी शाळेबाहेर मोठे आंदोलन केले गेले होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"