फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
महाराष्ट्र

महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी सरकारचे पाऊल

महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी सरकारचे पाऊल

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली आणि सुरक्षेची नवीन नियमावली आता सरकारकडून तयार करण्यात आली आहे, अशी माहिती चित्रा वाघ यांनी आज दिली.

चित्रा वाघ म्हणाल्या की, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदनाद्वारे काही मागण्या केल्या होत्या. त्यापैकी जवळपास सर्वच मागण्या मान्य झाल्या आहे, याबद्दल मी प्रताप सरनाईक यांचे समस्त लाडक्या बहिणींकडून आभार मानते. एसटीतील महिला मुलींचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा यासाठी सुरक्षेची नविन नियम सरकारकडून तयार करण्यात आले आहेत.

  • सर्व बसमध्ये CCTV कॅमेरा, ट्रॅकिंग सिस्टिम कंपल्सरी करण्याचे निर्देश देण्यात आले
  • बंद पडलेल्या बस १५ एप्रिलपर्यंत स्क्रॅपमध्ये टाकण्याचे आदेश
  • आगारात उभी असलेली सर्व भंगार वाहने हटवण्यात येणार
  • सुरक्षेच्या दृष्टीने बसचे नियमित ऑडिट करण्याचे आदेश
  • सुरक्षा रक्षकांमध्ये महिलांची संख्या वाढवण्यात येणार
  • सुरक्षेच्या दृष्टीने अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार
  • एसटी महामंडळात आयपीएस अधिकारी नेमावा, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"