तीर्थक्षेत्र आळंदी जवळ कत्तलखाना कधीच नाही होणार!

आळंदी : पिंपरी चिंचवड महापालिकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या प्रारूप सुधारित विकास आराखड्यात मोशी डुडुळगाव सीमेवर श्री क्षेत्र आळंदीपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर चार एकर जागेत कत्तलखाना प्रस्तावित करण्यात आल्याने समस्त नागरिकांमध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे ही माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांना समजल्यावर त्यांनी या ठिकाणच्या कत्तलखान्याला विरोध दर्शवला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत कत्तल खाण्यासाठी जे आरक्षण आहे ते आम्ही रद्द करू, असे आश्वासन सामंत यांनी आळंदीत दिले. श्रीक्षेत्र आळंदी येथे ह भ प प्रमोद महाराज जगताप यांच्या शशताब्दी पूर्वी कृतज्ञता सोहळा आणि गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी चैतन्य महाराज देगलूरकर ,शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर, संत वीर बंड्यातात्या कराडकर, खासदार रामभाऊ वाजे ,सत्कारमूर्ती महंत प्रमोद प्रमोद महाराज जगताप ,माजी आमदार गोरी राम पवार, अक्षय महाराज भोसले, पुरुषोत्तम महाराज पाटील, भाऊ महाराज परांडे, भागवत महाराज साळुंखे यासह महानुभव महंत वारकरी बंधू-भगिनी उपस्थित होते. ज्ञानेश्वरी ही सर्वसामान्यांच्या हातात पोहोचली पाहिजे, अशी लोकांची मागणी होती. त्यानुसार पुढच्या आठ तासात ज्ञानेश्वरीची छपाई करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी नमूद केलं .इतर क्षेत्राप्रमाणेच वारकरी पंथातही पद्म पुरस्कार दिला पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले .गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा महाराज कुरेकर यांना पद्म पुरस्कार मिळण्याची शिफारस केली जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
