पद्मश्री अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे 93 व्या वर्षी निधन !

सरकारी इतमामात आज अंत्यसंस्कार
सोलापूर : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचे वृद्धपकाळाने वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. 30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रोपदी मुरमु यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते या पुरस्कार सोहळ्यानंतर दिल्लीतून परतल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

मारुती चितमपल्ली यांनी वन खात्यात 36 वर्षे सेवा केली .त्या काळात देशभर संशोधक वृत्तीने भटकंती करून त्यांनी एकूण पाच लाख किलोमीटर प्रवास केला. चितमपल्ली यांना 13 भाषांचे ज्ञान होते .त्याद्वारे आदिवासी व इतर जमातींची संवाद साधत त्यांनी पर्यावरणाशी संबंधित मोठी माहिती मिळवली.होती .त्या माहितीची नोंद केलेल्या आणि तीस वर्ष जपून ठेवलेल्या शेकडो डायऱ्या उपलब्ध आहेत. डायरीतील नोंदीला शास्त्रीय आधार देत पक्षी कोश ,प्राणी कोश ,आणि मच्छकोशाचे लेखन पूर्ण केले .अरण्य वाचनासह प्राणी, पक्षी ,वनस्पतींची वैशिष्ट्यांसह वन्यजीवन विशद करणारी 25 पेक्षा जास्त पुस्तके चितमपल्ली यांनी लिहिली आहेत. निसर्गातील हा ठेवा समाजाला कळावा या भावनेतून सतत कार्यरत सकारात्मक विचारांच्या ऊर्जाकोश म्हणजे विख्यात पद्मश्री मारुती चितापल्ले होय.