फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
शिक्षण

सतत मेहनत करून मन स्थिर ठेवावे : इतिहास अभ्यासक नितीन बानुगडे

सतत मेहनत करून मन स्थिर ठेवावे : इतिहास अभ्यासक नितीन बानुगडे

कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या मनात नव्या उत्साहाचा संचार
पिंपरी : “न घाबरता सतत अभ्यास… भरपूर सराव… स्वतःवर आणि आयआयबीवर विश्वास… हा यशाचा राजमार्ग आहे”. यशाचे रहस्य मागे न पडणे आणि अथक परिश्रम करणे हे आहे आणि जर तुम्ही ते पाळले तर डॉक्टर,इंजिनिअर बनण्याचा तुमचा निर्धार सार्थ ठरेल. प्रेरणा आत्मविश्वास वाढवते आणि इच्छुकांना नवीन उत्साहाने त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरित करते, त्यासाठी सतत मेहनत करून मन स्थिर ठेवावे, असे प्रेरणादायी आवाहन प्राध्यापक, लेखक, इतिहास अभ्यासक नितीन बानुगडे यांनी आयआयबीच्या ‘विजयी भव’ कार्यक्रमा मध्ये केले.

महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबी करिअर इन्स्टिटयूटच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या प्रारंभानिमित पिंपरी येथील आयआयबी विद्यासंकुलच्या परिसरातील मैदानावर प्राध्यापक, लेखक, इतिहास अभ्यासक नितीन
बानुगडे यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचा कार्यक्रम विजयी भव आयोजित करण्यात आला होता, यावेळी व्यासपीठावर टाटा मोटर्स युनियन अध्यक्ष कामगार नेते सचिन लांडगे, डीसीपी पुणे बापू बांगर, इन्स्टिटयूटच्या संचालक दशरथ पाटील,मा. उपमहापौर तुषारभाऊ हिंगे, मा. उपमहापौर हिराबाई नानी घुले, नांदेड व्यवस्थापन टीमचे वाकोडे पाटील, बालाजी कदम, श्री. बनवारी, आयआयबी आयआयबी पुणे चे संचालक ॲड. महेश लोहारे, संत तुकाराम पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.कुंभार, आणि शिक्षकांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना नितीन बानुगडे म्हणाले की, भीती तुम्हाला मागे खेचते, भीतीवर विजय मिळविण्यासाठी त्यावर आक्रमण करा. जे सोपे आहे, ते जमणारच आहे, जे जमत नाही त्यावर आक्रमण करा, ही अभ्यासाची सर्वात मोठी पद्धत आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, भिणाऱ्याला सर्वच घाबरवतात; पण निर्भय माणसासमोर संकटे सुद्धा शरण येतात. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयायापासून दूर जायलाच नको, हेच सर्वात मोठे यशाचे कारण आहे.

डॉक्टर्स, इंजिनिअरचे ध्येय ठरलेय ना? तर इतरत्र भटकू नका. मन स्थिर ठेऊन अभ्यास करा. ध्येय ठरवा, मेहनत करा यश निश्चित मिळेल. ते पुढे म्हणाले की, आजकाल विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचे व्यसन लागले असून,शैक्षणिक जीवनात ते घातक ठरू शकते, यासाठी पालकांनीही अग्रेसर भूमिका निभावणे गरजेचे आहे. आजकाल विद्यार्थ्याना कोणते मित्र चांगले, कोणते वाईट कळणे झाले. त्यामुळे तुमची संगत चांगली ठेवा, जेणेकरून तुमचा शैक्षणिक प्रवास सुखकर होईल, त्यासाठी डॉक्टर्स, इंजिनिअर होण्याच्या कार्यकाळात आयआयबी तुमच्या सदैव पाठीशी आहे, त्याचा पुरेपूर फायदा घ्या, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास विविध शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच पालकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष घुले यांनी केले तर शेवटी आभार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सतीश कुमदाळे यांनी मानले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"