उद्या महाराष्ट्र बंद राहणार का?

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : बदलापूर येथे शाळेत झालेल्या दोन लहान मुलींवर झालल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून उद्या म्हणजेच २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, कोणत्याही राजकीय पत्राला बंद पुकारण्याचा अधिका नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हा राज्यव्यापी बंद मागे घेतला जावा, असं आवाहन केलं आहे.
राज्यव्यापी बंद बेकायदेशीर असल्याचे सांगत बंद करण्यात आलाल, तर कायदेशीर कारवाई करावी असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या या बंदच्या विरोधात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणी दरम्याान कोर्टाने सरकारला हे आदेश दिले आहेत.
दरम्यान, संविधानाचा आदर राखत २४ ऑगस्ट रोजी होणारा राज्यव्यापी बंद मागे घ्यावा असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे. त्यांनी एक्सवरून ही माहिती दिली आहे.
शरद पवार यांनी काय म्हटलंय?
‘बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता.