इस्रोचे माजी प्रमुख के कस्तुरीरंगन यांचे निधन!

बंगळुरू : भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे माजी प्रमुख के कस्तुरीरंगन यांचे आज शुक्रवारी दिनांक 25 एप्रिल रोजी सकाळी बंगळूर येथील निवासस्थानी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव रविवार 27 एप्रिल रोजी सकाळी दहा ते दुपारी बारा दरम्यान रामन रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये जनतेला अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.
के. कस्तुरीरंगन हे नऊ वर्षे इस्रोचे प्रमुख होते. या कार्यकाळात त्यांनी इस्रो, अंतराळ आयोग आणि अंतराळ विभागाचे नेतृत्व केले .ते 27 ऑगस्ट 2003 रोजी सेवानिवृत्त झाले .के कस्तुरीरंगण यांच्या कार्यकाळात पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही रॉकेटच्या विकास कार्यक्रमांनी वेग घेतला .पर्यावरणाच्या रक्षणासाठी के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. नंतर माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. दोन्ही समित्यांनी पश्चिम घाटावर खाणकाम आणि सर्व प्रकारच्या उत्खननावर बंदी घालण्याची शिफारस केरळ आणि कर्नाटक सरकारला केली होती दोन्ही राज्यांमध्ये या शिफारशींना स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात विरोध झाला. शेतकऱ्यांनी एका वर्षात एकापेक्षा जास्त पिकांची शेती करावी अशी शिफारस के कस्तुरीरंगन यांच्या समितीने केली होती. विशेष म्हणजे अशी शिफारस माधव गाडगीळ समितीनेही केली होती. मात्र पुढे या कस्तुरीरंगन व माधव गाडगीळ यांच्या शिफारशी राजकीय कारणामुळे बासनात गुंडाळण्यात आल्या .

भारताची रिमोट सेन्सिंग क्षमता विकसित करण्यात के कस्तुरीरंगात यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी भास्कर I आणि सेकंड II उपग्रहासाठी प्रकल्प संचालक म्हणून काम केले. पृथ्वीची अंतराळातून पाहणी करणे आणि पृथ्वीवरील तांत्रिक कामांसाठी उपग्रह प्रक्षेपित करण्याचा मोठा कार्यक्रम त्यांच्या काळात सुरू झाला. इन्सॅट टू आय आर एस एक अ आणि एक ब हे महत्त्वाचे उपग्रह त्यांच्या काळात प्रक्षेपित करण्यात आले भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले जाते .2003 ते 2009 या काळात राज्यसभेचे मानत सदस्य म्हणून त्यांनी काम केले सरकारने त्यांना वेगवेगळे वर्षात पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्काराने गौरविले आहे.