कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उद्योन्मुक माहिती तंत्रज्ञानाच्या धोरणास मान्यता!

कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी निर्णय
मुंबई : शेती उद्योगात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उद्योन्मुक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडविता येणार असल्याने महा -ऍग्रो एआय धोरणास 2025- 29 या कालावधीसाठी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे .राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला .
कृषी क्षेत्रातील या धोरणामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता ,माहिती तंत्रज्ञान ,ड्रोन, संगणकीय दृष्टी क्षमता, रोबोटिक्स आणि डेटा विश्लेषण यांचा वापर करून राज्यातील शेती उद्योगात मोठे तांत्रिक परिवर्तन या निर्णयामुळे घडवण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे . यामुळे महा -डीबीटी , महावेद ,ॲग्री स्टॅक ,डिजिटल शेती शाळा , एगमार्क ,नेट क्रॉप शॉप यासारखे महत्त्वाचे प्रकल्प यामुळे आणखी सक्षम होतील .

19 75 च्या आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेले नागरिक आजही लोकशाहीचे खरे रक्षक मानले जातात ,अशा लोकांच्या मानधनात आता दुपटीने वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे .देशातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी पैकी असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला नव संजीवनी देण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णयही बैठकीत घेण्यात आले . अनिवासी भारतीय नागरिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी नव्या धोरणात्मक सवलती आणि योजना जाहीर करण्यात आले आहेत . त्यामुळे त्यांना राज्यातील शैक्षणिक संधी अधिक उपलब्ध होतील .
ट्राय ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर साठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास नाशिक जिल्ह्यातील मौजे जांबुटके येथील 29 हेक्टर 52 आर जमीन ,आदिवासी समाजातील होतकरू उद्योजकांना प्रोत्साहन रोजगार निर्मिती व आर्थिक विकासाला चालना मिळणारा निर्णय , मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी आवश्यक मौजे पहाडी गोरेगाव येथील जमिनीच्या हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्क माफ , विद्यापीठाला स्वमालकीची इमारत , हजारो विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार असे काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत .कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उद्योन्मुक माहिती तंत्रज्ञानाच्या धोरणास मान्यता