फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
देश विदेश

पाकिस्तानवर एअर स्ट्राईक; नऊ अतिरेक्यांचे कॅम्पस उद्ध्वस्त!

पाकिस्तानवर एअर स्ट्राईक; नऊ अतिरेक्यांचे कॅम्पस उद्ध्वस्त!

ऑपरेशन सिंदूर यशस्वी
नवी दिल्ली: पहलगाम येथील अतिरेक्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी अखेर भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्पस उध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलाने 7 एप्रिल रोजी मध्यरात्री एक वाजून पाच मिनिट ते एक वाजून 30 मिनिट या कालावधीत ही एअर स्ट्राईक करून दहशतवादाचा बदला घेतला आहे. या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले होते . अतिरेक्यांचे नऊ कॅम्पस उध्वस्त करून यशस्वी कारवाई केली याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कराचे अभिनंदन केले आहे.

जैस ए मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन, लष्करये तोयबाचे तळ उध्वस्त करून भारतीय वायुदलाने ही कारवाई केली. उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेने पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणावर हल्ला केला नाही .भारतीय सेनेने या मोहिमेत बहावलपूर, कोठली आणि मुजफ्फरबाद या तीन शहरांमधल्या केवळ नऊ अतिरेक्यांच्या कॅम्पसचा अचूक लक्ष साधलं .ऑपरेशन सिंदूर मध्ये बहावलपूर मध्ये जैस ए मोहम्मद चे हेडक्वार्टर भारतीय सेनेने उद्ध्वस्त केले. भारताच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्तपणे पाकिस्तानातील दहशतवादी छावण्यावर 24 क्षेपणास्त्र हल्ले केले .यामध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवादी मृत्युमुखी पडले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

viarasmall
viarasmall

जैस ए मोहम्मदचा मोहम्मद अझर यांच्या कुटुंबातील दहा जणांचा यात समावेश आहे. भारताने आपल्या हद्दीत राहून हा हवाई हल्ला केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. हा हवाई हल्ला पाकिस्तानच्या सुमारे 100 किलोमीटर आत करण्यात आला . भारताच्या लष्कराने केलेल्या या हल्ल्यामध्ये पाकिस्तान मधील नागरीकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे .पाकिस्तानचा लष्कर प्रमुख मुनीर यांच्या वक्तव्यामुळे भारताने सडेतोड उत्तर दिले आहे. पाकिस्तानी नागरिक या कारवाईला पाकिस्तानी लष्कर कारणीभूत असल्याचा आरोप करीत आहे.

हल्ल्यानंतर पाक बिथरला
भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि जम्मू काश्मीर मधील अतिरेकी कॅम्पस उध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानी लष्कर बिथरले आहे .जम्मू आणि काश्मीर मधील नियंत्रण रेषेवरील गावांवर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला आहे .यामध्ये एक महिला आणि दोन मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला आणि 38 जण जखमी झाले आहेत .पूंछ जिल्ह्यात सर्वाधिक जीवितहानी झाली .भारतीय सैन्याने युद्धबंदी उल्लंघनाला सडेतोड प्रत्युत्तर दिले .सीमा रेषेवरील अनेक गावांवर पाकिस्तानने तोफगाळे डागले आहेत. भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्यक्त काश्मीर मध्ये रात्री उशिरा केलेल्या एयर स्ट्राइक मधील नऊ दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पंधरा दिवसानंतर लष्कराने दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मदतनिसांना सडेतोड उत्तर दिले आहे ,यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"