विकासाचा वादा: महेशदादा!

शिव-शंभूचा शिलेदार!
सह्याद्रीच्या खोऱ्यास भक्ती आणि शक्तीची मोठी परंपरा आहे. वारसा आणि वसा आहे. याच भूमीत शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले आणि ‘दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा..!’ ही धमक, ताकद निर्माण केली आणि त्याच आत्मविश्वासाने दिल्लीश्वराचे तख्तावर धडक दिली. तख्तही हलविले. मुघल बादशहास नामोहरम केले. तर स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांनी अखेरच्या श्वासापर्यंत स्वराज्याचा स्वाभिमान आणि मराठा बाणा -कणा ताठ ठेवला. स्वराज्याभीमान जागविला. तर, वारकरी भूषण संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या परंपरेने भक्तीचे सिंचन करून इंद्रायणीतीरी भक्तीचा मळा फुलवीला आणि विश्व कल्याणाचा मार्ग आणि जीवन समृद्धतता, विचारांचा सुगंध, प्रगल्भ विचार याच मातीने; अर्थात शिवनेरी आणि सह्याद्रीच्या मावळ, मुळशी, खेड प्रांताने दिला आहे. याच भूमीतील, मातीतील एक रत्न म्हणजेच लोकधर्मी, समाजधुरीण, लोकजिवी, कला क्रीडा प्रेमी, लोककर्मी, मायाळू, कणखर, तरुण- तडफदार, भोसरीचे दमदार आधुनिक स्वराज्याचा छावा अर्थात आमदार महेश दादा लांडगे होय. अर्जुनसारखा मित्र, सुदाम्यासारखा सखा म्हणून ते अविरतपणे कार्यरत आहेत.
सह्याद्रीच्या खोऱ्यातील मावळ प्रांतात शिव विचार उपजला, वृध्दिंगत आणि प्रखर झाला! याच मातीने स्वराज्याचे तोरण बांधून महाराष्ट्रात स्वराज्य अभिमान जागविला. या मातीतील एक रत्न म्हणजेच भोजापूर अर्थात भोसरीचे महेशदादा हे होय. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार…’ ही आधुनिक संत वामनराव पै यांची उक्ती सार्थ ठरविणारे मूर्तिमंत उदाहरण ! शिव विचार ज्यांच्या नसानसात आहे. औदार्य आणि शिवशंभूची धडाडी आणि शौर्य ज्यांच्यात उतरलंय, असे हे व्यक्तिमत्व! कुस्तीचा आखाडा असो की, राजकारण, समाजकारणाचा पट असो; किंवा विधानसभेचा आखाडा ज्यांनी गाजविला आहे, असे हे युवा आणि आश्वासक नेतृत्त्व. सदोदित लोकल्याणाचा वसा घेऊन कार्यरत असणारा आमदार!
पिंपरी चिंचवड महापालिकेत आजूबाजूंच्या गावे समाविष्ट होऊन पंचवीस वर्षे झाली. मात्र, विकासापासून वंचितच राहिली. या परिसराचा चेहरा- मोहरा बदलण्याचे काम ‘लोकमना’तील आमदार महेशदादा लांडगे यांनी केले आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये भोसरी परिसरामध्ये विविध महत्वाकांक्षी प्रकल्प उभारून विकासाची गंगा आणली आहे. आजवर प्रलंबित असलेले प्रश्न सोडविले आहेत.
अवैध बांधकामे नियमितीकरणाचा लढा असेल, किंवा बफर झोनबाबत यशस्वी पाठपुरावा, पिंपरी- चिंचवडचे औद्योगिक भूषण हिंदुस्थान अँटिबायोटिक कंपनीच्या कामगारांसाठी झटणे, झगडणे असेल, रेड झोन आणि बैलगाडा शर्यतीच्या शर्यतीसाठी ‘रक्ताचे पाणी’ करणे असेल. किंवा चिखली- घरकुलातील लाभार्थींना न्याय मिळवून देणे, चिखली रुपी बँकेच्या ठेवेदारांना लाभ, मोशीतील उपबाजार समितीतील गाळेधारकांना न्याय मिळवून देणे असेल, वीज, पाणी रस्ते या मूलभूत समस्यांचे निराकरण करण्याबरोबरच, सेवा सुविधांचे सक्षमीकरण करण्याबरोबरच विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारून भोसरीची ओळख महाराष्ट्रात निर्माण केली आहे. अर्थात ‘विकासाचा वादा महेशदादा’ हे ब्रीद त्यांनी सार्थ ठरवले आहे. महत्वाची बाब म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शाह, राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री आणि लोकमनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांनी ….. हजार कोटींचा निधी आणि विकास कामे करून आपले नेतृत्त्व आणि वर्चस्व सिद्ध केले आहे.

संतभूमीतील इंद्रायणीच्या चेहऱ्यावर आता येणार हास्य !
संत तुकाराम महाराज संतपिठाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे नेण्याचे काम असेल किंवा कुस्तीची भव्य आणि दिव्य परंपरा असणाऱ्या भोसरी परिसरामध्ये कै. मारुतराव रावजी लांडगे कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारणे असेल, राज्य शासनाची विविध व वसतीगृह, पुण्यातील महत्त्वाची शैक्षणिक संकुले पिंपरी- चिंचवडमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणे असेल, यामधून कला आणि क्रीडा यास प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्याचबरोबर महेशदादा लांडगे सोशल फाउंडेशन, अविरत प्रतिष्ठानाच्या वतीने पर्यावरण रक्षण, नदी रक्षणाचं आणि क्रीडा क्षेत्र समृद्धीचे मोठं काम महेशदादांनी उभं केलं आहे. महेशदादांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा आणि फलश्रुती म्हणजेच इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला गती मिळाली आहे. तसेच नाशिक फाटा ते चाकण या मेट्रो मार्गाचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. त्यामुळे नाशिक फाटा ते चाकण पिंपरी ते निगडी असा मल्टीमॉडेल हब होण्यासाठी मदत होणार आहे. नमामि इंद्रायणी प्रकल्पाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या इंद्रायणीला प्रदूषणमुक्त करण्याचा ध्यास महेशदादांनी घेतलेला आहे. त्याचसाठी सायकल मॅरेथॉन काढून नदी प्रदूषणाबाबत जागृती, नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी अविरतपणे काम सुरु आहे.
कचरा मुक्त शहर !
पिंपरी- चिंचवड शहराच्या स्थापनेपासून येथील कचरा मोशी येथील डेपोमध्ये मोठ्या प्रमाणावर साचविला आहे. त्याठीकाणी कचऱ्याचे डोंगर निर्माण झाले आहेत. त्यामुळे आजू-बाजूच्या राहिवाश्याना, नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. या दुर्गंधीपासून मुक्ततेसाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी महेशदादांनी पाऊल उचललं आणि आजपर्यंत निर्माण झालेल्या कचऱ्याचे विघटन करण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यातूनच ‘वेस्ट एनर्जी प्रकल्प’ उभा राहिला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रतिदिन नऊशे ते हजार मीटर कचऱ्यावर प्रक्रिया होत असून त्यातून वीज निर्मिती करून महापालिकेला उत्पन्न मिळवून देण्याचे काम केले आहे.
स्वतंत्रपणे पोलिस आयुक्तालय !
पिंपरी- चिंचवड शहराच्या निर्मितीपासून या शहराला स्वतंत्रपणे पोलीस आयुक्तालय नव्हते, त्यामुळे सार्वजनिक सुरक्षितता आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते. काळाची गरज ओळखून महेशदादांनी पिंपरी- चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याची परिणीती म्हणजे आज शहरातील गुन्हेगारीचा टक्का बऱ्यापैकी आटोक्यात आला आहे. तसेच, नागरिकांना सामाजिक सुरक्षितता प्रदान करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, हि बाब कौतुकास्पदच. देहू- आळंदी पुणे पालखी मार्गावरील बी.आर.टी मार्ग निर्माण झाल्यानंतर या मार्गावरून वारकऱ्यांना वारीची वाट सुकर व्हावी, यासाठी प्रशस्त असा मार्ग निर्माण केला आहे.
देशातील पहिले संविधान भवन; आंतरराष्ट्रीय सफारी पार्क!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य, दीन दुबळ्यांना, पददलितांना घटना -संविधान दिल्याने त्यांना स्वभिमानीनाने जगण्याचा हक्क मिळाला आहे. राज्यघटनेचा अभ्यास आणि जनजागृती यासाठी पिंपरी- चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये देशातील पहिले संविधान भवन
उभारण्याचा संकल्प महेशदादांची आहे आणि त्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तसेच मोशी येथे आरक्षित असणाऱ्या सिंगापूर येथील सेंटोसा पार्कच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय सफारी पार्क उभारण्याचे काम प्रक्रिया सुरू झालेली आहे.
दिवसाआड पाणीपुरवठ्यातुन मुक्तता !
शहराचा विकास होत असताना, मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती, नागरिकरण वाढली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता आणि यापूर्वीच्या नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने दिवसाआड पाणीपुरवठ्याला नागरिकांना सामोरे जावे लागत होते. शहराची गरज आणि भविष्यातील नागरीकरणाचा वेग लक्षात घेता महेशदादा लांडगे यांनी आंध्रा, भामा-आसखेड पाणी योजनेसाठी पुढाकार घेतला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पाणी योजना प्रगतीपथावर आहे. त्यामधून ३०० एमएलडी पाणी उपलब्ध होणार असल्याने समाविष्ट गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे.

कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्राला समृद्धता!
कला आणि क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी, क्रीडा संस्कृती वाढवण्यासाठी भोसरीला स्पोर्ट सिटी नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी महेशदादा यांनी प्रयत्न केले आहेत. तसेच अण्णासाहेब मगर स्टेडियमचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘स्पोर्ट सिटी’ प्रकल्प निर्माण करण्याचे त्यांचे ध्येय आहे. सर्वे नंबर ५३९ चिखली येथे १३ एकरमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय निर्माण होत आहे. त्यामुळे क्रीडा पंढरीबरोबरच भोसरीची ओळख शैक्षणिक पंढरी अशी होणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाना साकार करण्यासाठी ते अविरतपणे काम करीत आहेत. आवास योजनेला गती देण्याचे काम महेशदादा यांनी गेल्या पाच वर्षात केले आहे आणि त्यातून भोसरी परिसरातील १० हजार कुटुंबांना हक्काचे घर मिळणार आहे. त्याचबरोबर मोशीत १०० फूट उंचीचा छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारून मराठयांच्या इतिहासास उजाळा दिला जाणार आहे.
शाश्वत शहर निर्माण करण्यासाठी !
औद्योगिकनगरी म्हणून जागतिक नकाशावर प्रसिद्ध असणाऱ्या भोसरी विधानसभेतील मोशी येथे पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यासाठी महेशदादा यांनी मोठ्या प्रमाणावर योगदान दिले. त्यावर ९७५ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे, लवकरच जागतिक नकाशावर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र ही पिंपरी चिंचवडची ओळख ठरणार आहे. शहरामध्ये विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारत असतानाच, नागरिकांचे राहणीमान उंचवणारे, शाश्वत शहर निर्माण करण्यासाठी महेशदादा यांनी योगदान दिले आहे. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांमधून शहरातील वाहतूक नियमन, गुन्हेगारांवर वचक आणि नागरी सुरक्षितता वाढणार आहे. त्याचबरोबर स्मार्ट कियोकसमधून महापालिकेचे उत्पन्न वाढणार आहे. लवकरच पाणीपुरवठा आणि मैला शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प, पार्किंग समस्या निकालात निघणार आहे. ई क्लास रूमच्या माध्यमातून शिक्षणाचा दर्जा उंचावला जाणार आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवणे ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून ती आपली आहे, या भावनेतून महेशदादांनी भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये परिवर्तन हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरी शैक्षणिक, आरोग्य, मंत्रालय आणि महापालिका संबंधी विविध प्रश्न सोडवले जात आहेत. त्याचबरोबर नोकरीविषयक सल्ला, महिला समस्यांचे निराकरण आणि सामाजिक संस्था आणि संघटना समन्वय या हेल्पलाइनच्या माध्यमातून केला जात आहे. त्यातून …. लाखाहून अधिक नागरिकांच्या समस्या सोडवण्यात यश मिळवले आहे.
प्रशासन, नागरिक यातील पूल बनण्याचे काम
पिंपरी- चिंचवड शहरामध्ये नागरीकरण वाढत आहे. समाविष्ट गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प साकारले जात आहेत. नवीन सोसायटी निर्माण झालेल्या आहेत आणि त्यातून अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. या प्रश्न सोडवण्यासाठी महेशदादांच्या नेतृत्वाखाली हक्काचे व्यासपीठ निर्माण केले आहे. गृहनिर्माण सोसायटी आणि महेशदादांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून गृहनिर्माण सोसायटीचे प्रश्न सोडवले जात आहेत. शहराच्या विकासामध्ये योगदान देण्याबरोबरच महिला सक्षमीकरणासाठी महेशदादा प्रयत्न करत आहेत. बचत गटांचे मोठं काम त्यांनी विधानसभा मतदारसंघात सुरू केले आहे. पुण्यातील भीमथडी आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पवनाथडी जत्रेच्या धरतीवर इंद्रायणीथडीचे आयोजन करून त्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या जत्रेत महिलांना व्यासपीठ मिळण्याबरोबरच, रोजगार निर्मिती करून देणे तसेच या उपक्रमातून कोट्यावधींची उलाढाल करून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न केला जात आहे.
समाविष्ठ गावांना मिळाला न्याय !
आमदार झाल्यानंतर महेशदादांनी महत्त्वाचं काम केलं. ते म्हणजे २५ वर्षांपासून विकासापासून वंचित असणाऱ्या समाविष्ट गावांना न्याय मिळवून देण्याचं. या भागास विकास पथावर आणण्याचं काम केले आहे. या भागातील चऱ्होली, मोशी, चिखली, तळवडे, दिघी या गावात मध्ये विकासाची गंगा आली नव्हती. त्या भागांमधील रस्त्यांचे जाळे, मैला शुद्धीकरण प्रकल्प, भूमिगत वीज वाहिन्यांचे सक्षमीकरण, अद्यावत स्मशानभूमी, जलतरण तलाव, क्रीडांगणे असे विविध प्रकल्प उभारून या भागाला विकासाचे मॉडेल बनविले आहे. तसेच महेशदादांच्या प्रयत्नातून अनेक रुग्णांना जीवनदान मिळालेले आहे. मुख्यमंत्री सहायता निधी तसेच स्वतःच्या खिशातून भोसरी विधानसभा मतदारसंघातील सुमारे … जणांना तब्बल … कोटीचा निधी मिळवून दिलेला आहे. तसेच महापालिकेच्या विविध रुग्णालयांच्या माध्यमातून रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि व्हिजन अकॅडमीच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षापासून क्रीडा क्षेत्रामध्ये अतुलनीय काम केले जात आहे. कराटे, जुडोपासून तलवारबाजी, रायफल शूटिंग, मॅरेथॉन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्याबरोबरच या केंद्रामध्ये महिलांचा स्वतंत्र कबड्डी संघ कार्यरत आहे. त्याचबरोबर कबड्डीचे खेळाडू घडवण्याचं काम केलं जात आहे. त्याचबरोबर व्हिजन अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस आणि सैनिक भरतीसंदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. आणखी विशेष म्हणजे, भोसरी परिसराला ग्रीन सिटी, क्लीन भोसरी यासाठी महेशदादा अहव्यातपणे झटत आहेत. कामगारासाठी कल्याणकारी उपक्रम, चिखली मोशी चऱ्होली रेसिडेन्शिअल कॉरिडॉर उभारला जात आहे. उद्यान विकास आणि पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण, आरोग्य सुविधा आणि स्वच्छ भारत अभियान, अद्यावत भाजीबाजार, बांधकाम साहित्यापासून वीट निर्मिती, पंतप्रधान आवास योजना, भक्ती- शक्ती चौकामध्ये तीन मजली पूल, अर्बन स्ट्रीट डिझाईन अशा विविध प्रकल्पांची पायाभरणी करून त्या प्रकल्पांना पूर्णत्वास नेण्याचे काम त्यांनी केला आहे. अर्थात दादांच्या मते ‘भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये बदल घडतो आहे तो केवळ भोसरी परिसरातील मतदारांनी दिलेल्या साथीमुळे!’ आणि हीच साथ यापुढेही हवी आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.