जालन्याजवळ अपघातात ५ ठार

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
जालना, प्रतिनिधी : जालना येथे गेवराईकडून अंबडकडे जाणाऱ्या बसने ट्रकला धडक दिल्याने पाच जणांचा जागीत मृत्यू झाला आहे. तर १४ जण जखमी झाले आहेत. वडीगोद्री रस्त्यावर शहापूरजवळ हा उपघात झाला आहे. या धडकेस बस आणि ट्रकचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
जालना आणि वडीगोद्रीदरम्यान शहापूर गाव आहे. या गावाजवळ हा अपघात झाला आहे. प्रवाशांना घेऊन ही बस गेवराईकडून बस अंबडकडे जात होती. त्यावेळी विरुद्ध दिशेने, जालन्यावरुन समोरुन येणारा मोसंबीने भरलेला ट्रक यांची समोरासमोर धडक झाली आहे. बसमध्ये एकूण २० ते ३० प्रवासी होते. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले आहे. जखमींना अंबड शहरातील प्राथमिक आरोग्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात अतिशय भीषण झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. त्यामुळे अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.