फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी ‘एसआयटी’ची स्थापना!

सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी ‘एसआयटी’ची स्थापना!

बसवराज तेली ‘एसआयटी’चे प्रमुख; १० सदस्यांचा समावेश
मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने बुधवारी १० सदस्य असलेल्या विशेष तपास पथकाची स्थापना केली. गुन्हा अन्वेषण विभागाचे (सीआयडी) उपमहानिरीक्षक बसवराज तेली हे एसआयटीचे प्रमुख असतील.

गृह मंत्रालयाने बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या एसआयटीमध्ये पोलीस उपायुक्त अनिल गुजर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल, स्थानिक गुन्हे विभागाचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, सहाय्यक उपनिरीक्षक तुळशीराम जगताप आणि पोलीस कॉन्स्टेबल मनोज वाघ, चंद्रकान्त काळकुटे, बाळासाहेब अहंकारे आणि संतोष गित्ते आदींचा समावेश आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात हत्येसह चार गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. यात अपहरण आणि हत्या, दोन कोटी रुपयांची खंडणी, ॲट्रॉसिटी आणि मारहाण अशा चार गुन्ह्यांची नोंद आहे. या चार गुन्ह्यात पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा पुण्यात सीआयडी कार्यालयात मंगळवारी शरण आला. त्याच्याशिवाय चार गुन्ह्यांत ९ संशयित आहेत. यापैकी चार जण अद्याप फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणातील फरारी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे आरोपी आहेत. त्यांचे सीडीआर घेतले जातील. कॉल डिटेल्सवरुन सगळे समोर येईल. कोणी खंडणी मागितली, कोणी मागायला लावली, कोणी फोन करायला लावले, आरोपी कोणी फरार केले, आरोपींना कोण सांभाळते हे सगळे चौकशीतून पुढे येईल. या प्रकरणातील आरोपींना मोक्का लागणार आहे. ३०२ चा गुन्हाही लावला जाऊ शकतो. सरकारने हे केले नाही तर मराठे पुन्हा रस्त्यावर येतील, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.णाला फोन केले. आरोपींना कोणी पळवून लावले. कोणी आसरा दिला, हे सर्व बाहेर येणार आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"