नक्षलवाद नष्ट करण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची गरज

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : येत्या मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी सर्व सुरक्षा दल आणि यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) या कामी खूप महत्त्वाची भूमिका बजावेल, असे अमित शाह यांनी सोमवारी छत्तीसगडमधील नक्षलवादी कारवायांचे परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आढावा बैठक घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
या बैठकीत मुख्यमंत्री विष्णू देव साई, उपमुख्यमंत्री विजय शर्मा, केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन, छत्तीसगडचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे (CAPFs) महासंचालक उपस्थित होते, असे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. बैठकीदरम्यान, शाह यांनी मार्च २००६ पर्यंत एलडब्ल्यूईचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व दल आणि एजन्सींना एकत्रित प्रयत्न करण्यास सांगितले, असे त्यात म्हटले आहे.
छत्तीसगड पोलिस आणि इतर सुरक्षा दलांनी नक्षलवादाविरुद्धच्या लढाईत एकत्रित पद्धतीने काम केले आहे आणि गेल्या एका वर्षात अतिरेक्यांना जास्तीत जास्त नुकसान पोहोचवले आहे, हे एक मोठे यश आहे, असे वक्तव्य शाह यांनी नमूद केले आहे.