फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
राजकारण

माझ्या नादाला लागू नका!

माझ्या नादाला लागू नका!

फक्त मुद्द्याचं न्यूजनेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : शिवसेना (यूबीटी) पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात नारळ, शेण आणि बांगड्या फेकल्याच्या घटनेनंतर राज ठाकरे यांनी मनसैनिकांचे व्हिडिओ कॉलवरून कौतुक केले. या घटनेची जबाबदाली मनसैनिकांनी स्वीकारली आणि माझ्या नादाला लागू नका, असा इशारा पुन्हा एकदा दिला आहे.

ठाणे इथं उद्धव ठाररे यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर मनसैनिकांनी निदर्शनं केली. नारळ फेकले. हे कृत्य संतापातून आलेलं होतं, असं राज यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची यात्रा धाराशिवपासून सुरू झाली आणि तिथपासून यात्रेत विघ्न आणण्यास प्रारंभ झाला, असं ते म्हणाला. मराठा आंदोलनाच्या नावाखाली घोषणा देणारी मंडळी ही प्रत्यक्षाच शरद पवार आणि उद्धव गटाशी संबंधित होती, असंही त्यांनी सांगितलं. माझ्या नादाला लागू नका, असं मी यापूर्वीही सांगितलं आहे. कारण मनसैनिक काय करू शकतात, याची प्रचिती अख्ख्या महाराष्ट्राला आधीपासूनच आहे.

राज ठाकरे म्हणाले की, राजकारण करत असताना विकासाचे मुद्दे घेऊन लढाई करा. मात्र, कोणत्याही थराला जाऊन बोलणे आणि दौऱ्यामध्ये विघ्न निर्माण करणे योग्य नाही. दरम्यान, राज ठाकरे यांनी मनसैनिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मनसैनिकांसारख्या विस्थापितांची मोठी शक्ती माझ्या पाठीशी आहे, असंही ते म्हणाले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"