गोरक्षकांचे आधारस्तंभ!

- शिवशंकर स्वामी
गोमातेच्या सेवेत आजही आमचे जीवन अर्पिलेल्या, माझ्यासारख्या गोरक्षकांसाठी, आजच्या राजकीय नेत्यांचे पाठबळ गरजेचे असते. आणि ह्या कार्यात आमचे मार्गदर्शक श्री. पै. महेशदादा लांडगे आम्हा गोरक्षकांस अभिमान वाटावे अशी सोबत देतात व गोमातचे आणि गोरक्षकांचे आधारस्तंभ बनतात.
भारतीय संस्कृतीच्या अनेक महत्वाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे अनादी काळापासून भारतात निसर्गाला, प्राणी, पक्षी, नद्या, समुद्र, पर्वत ह्या सर्वांना देवाचाच एक अंश मानले जाते. भगवान श्री कृष्णाच्या कथांपासून ते संत तुकारामांच्या अभंगां पर्यंत, निसर्गातील प्रत्येक घटकाला या भूमीत देवा समान पूजिल्याचे दाखले आहेत. आणि त्या सर्वांमध्ये गोमातेला अत्यंत मानाचे स्थान प्राप्त आहे. भगवंताच्या गोकुळातील क्रीडांपासून वा राम राज्यापासून ते छत्रपतींच्या स्वराज्यापर्यंत, गोमातेला प्रत्येक युगात मानेचे स्थान होते.
2019 साली पुणे पांजरपोळ ट्रस्ट येथे एका कार्यक्रमादरम्यान दादांचा आणि माझा परिचय झाला. त्या कार्यक्रमा दरम्यान संवादात, दादांची गो- संवर्धनाच्या कामा प्रतीची निष्ठा व आमच्या सारख्या कार्यकर्त्यां करीता भक्कम समर्थन देण्याची तयारी, हे आश्वासक वाटले. त्यानंतर प्रामुख्याने दादांची गोभक्ती आमच्यातील सलोखा वाढवणारी ठरली. दादांच्या घरी देखील गोठा व गायीचे वास्तव्य आहे. शेतकरी कुटुंबातील सदस्य म्हणून गेले अनेक वर्ष ते स्वतः गायीची सेवा करीत आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वातील हिंदू संस्कृतीसाठी निष्ठा व गोमातेसाठी श्रद्धाभाव मी पावलापावलावर अनुभवाला आहे. एवढेच नव्हे तर २०२० च्या COVID च्या काळात, जेव्हा त्यांच्यावर इतरही अनेक जबाबदाऱ्या असतील, त्या काळात त्यांनी आमच्या पांजरपोळ ट्रस्टला लागणारी सर्व मदत केली व कुठलीही अडचण भासू दिली नाही. गोसेवे सोबतच ट्रस्ट च्या सर्व कामगार व कार्यकर्त्यांच्या आरोग्य व औषधपाण्याची काळजी देखील दादांनी त्या कठीण काळात आत्मियत्तेने घेतली.

वैयक्तिक, माझ्या कार्यात देखील मला जेंव्हाही समस्यांचा सामना करावा लागला तेंव्हा दादांची भक्कम व निर्भीड साथ मिळाली. 2021 साली माझ्यावर आळेफाटा ह्या ठिकाणी प्राणघातक हल्ला झाला होता त्यावेळीच दादांच्या लक्षात आले की गोरक्षण करताना मला राज्य सरकारने दिलेले पोलिस संरक्षण तोकडे पडत आहे व त्याची त्यांनी तातडीने दखल घेतली. मला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या परंतु दादांनी नेहमी “प्रामाणिक पणे काम करत रहा, मी नेहमीच गोरक्षकांच्या सोबत ठामपणे उभा आहे” अश्या शब्दांत धीर दिला व मला पोलिस संरक्षण मिळावे म्हणुन ते प्रयत्नशील राहिले. गोरक्षणाच्या पवित्र कार्यासाठी कसल्याही प्रकारची मदत लागल्यास महेशदादा नेहमीच एका हाकेच्या अंतरावर असतात. नुकतेच इंदापूरमधील बेकायदेशीर कत्तलखाने भुईसपाट करण्यासाठी दादांनी मोलाचे सहकार्य केले. कत्तलखाने उध्वस्त झाल्यामुळे जो काही गोवंश वाचला जाणार आहे त्यांचे आशिर्वाद दादांना नक्कीच लाभतील. सर्व गोसेवकांच्या इच्छाशक्तीने व आशीर्वादाने दादा नक्कीच राजकारणात प्रगती करतील व महाराष्ट्राचे नाव मोठे करतील असे मला मनापासून वाटते.
काही महिन्यांपूर्वी दादांचं मायेचं ‘ छत्र ‘ हरपल. दादांच्या आयुष्यात एक खूप मोठी पोकळी निर्माण झाली , कधीही भरून न निघणार नुकसान झालं. दादांच्या दुःखात आम्ही सर्व गोरक्षक बांधव सहभागी होतो. जुनी लोकं म्हणायची की ‘घरातील माय आणि गोठ्यातील गाय देवघरातील देवासमान आहे’. आणि दादांवर त्या दोघींच्याही कृपा आशीर्वादाचा वृक्ष आहे. म्हणूनच दादांसारखा नेता आजच्या बदलत्या काळातही, इथल्या मातीत रुजलेल्या मुळांसारखा भक्कम व निश्चयी आहे. गोसेवे सोबतच दादांनी अनेकविध पर्यावरणपूरक कामे देखील केली आहेत. ह्या सगळ्याचा एका द्रष्ट्या राजकारण्याने विचार करणे व त्या दृष्टीने कार्य करणे हे आजच्या काळाची गरज आहे. म्हणूनच दादांसारखा नेता व त्यांचे आजच्या लोकशाहीत सक्रिय असणे खूप महत्वाचे वाटते. म्हणूनच आमच्या सारख्या गोसेवकांचा आधारस्तंभ असलेले दादा पुन्हा निवडून यावेत व यशाच्या सर्व शिखरांवर पोचून राज्याच्या मंत्रिपदावर विराजमान व्हावेत अशी गोमातेच्या चरणी प्रार्थना आहे.