आपल्या विचाराचे सरकारयेण्यासाठी आपला उमेदवार निवडून यायलाच हवा : खासदार श्रीरंग बारणे

मेळाव्यात आमदार अण्णा बनसोडे आणि शंकर जगताप यांच्या विजयाचा निर्धार !
पिंपरी : केंद्रात आणि राज्यात समविचारी सरकार असणे जनतेच्या हितासाठी चांगले असते. असे सरकार नसेल तर राज्याची प्रगती थांबेल. आपल्याला तसे होऊ द्यायचे नाही. आपल्या विचाराचे सरकार राज्यात येण्यासाठी आपला उमेदवार निवडून यायलाच हवा. त्यामुळे महायुती मधील सर्व घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी पिंपरीमधून अण्णा बनसोडे आणि चिंचवड मधून शंकर जगताप यांना निवडून आणणे गरजेचे असल्याचे मत खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले.
महायुतीचे पिंपरीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे आणि चिंचवडचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात खासदार श्रीरंग बारणे बोलत होते.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “पिंपरी आणि चिंचवड मधून महायुतीचे उमेदवार निवडून येतील. या मतदारसंघात महायुतीला मानणारा मोठा मतदार आहे. उमेदवार त्यांच्या पद्धतीने प्रचार करतील. पण इतर सर्व जबाबदारी आपल्याला स्वीकारली पाहिजे. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही जोमाने काम करू. ज्या उमेदवारांनी उमेदवारी मागे घेऊन एकत्रित जाण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे आभार.
जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले, “कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन महायुती मधील पक्षांबद्दल, महायुतीने घेतलेले निर्णय, योजना याबाबत माहिती द्यावी. लाडकी बहीण योजना सर्वांपर्यंत पोहोचवा. पिंपरी चिंचवड शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम अजित पवार यांनी केले आहे. त्यामुळे आपण आपले काम घेऊन लोकांपर्यंत जावे. तीनही मतदारसंघात आपल्याला महायुतीचे उमेदवार विजयी करायचे आहेत.
महायुतीचे पिंपरीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, “मला पुन्हा संधी दिल्याबद्दल सर्व वरिष्ठांचे आभार. उमेदवारी माघारी घेतलेल्या 21 पैकी 19 जणांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. झालं गेलं विसरून जाऊ. जनतेच्या कामांसाठी एकत्रित काम करू. कुणाचीही गैरसोय होणार नाही, याची मी कायम खबरदारी घेईन. निवडणुकी नंतर आपले रुसवे फुगवे आणि हक्काची भांडणे आपण सोडवू.
महायुतीच्या मेळाव्यासाठी विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, अमित गोरखे, सदाशिव खाडे, प्रशांत शितोळे, आर एस कुमार, मंगला कदम, चंद्रकांता सोनकांबळे, श्रीमती पठाण, कविता अल्हाट, महेश कुलकर्णी, गोरक्ष लोखंडे, राजेश पिल्ले, सुजाता पालांडे, बाळासाहेब वाल्हेकर, निलेश तरस, कुणाल वाव्हाळकर, सुरेश निकाळजे, अजिज शेख, सिकंदर सूर्यवंशी, कमल कांबळे, जितेंद्र ननावरे, प्रमोद कुटे, राजेश वाबळे, सरिता साने, राजेंद्र तरस, राजू दुर्गे, माऊली थोरात, शितल शिंदे, शाम लांडे, विश्वजित बारणे, संदीप वाघेरे, तुषार हिंगे, काळुराम पवार, शैलजा पाचपुते, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.