फक्त मुद्द्याचं!

1st December 2025
मुंबई

गोवंश हत्या कायदा अधिक कडक करण्याची गरज : आमदार शंकर जगताप

गोवंश हत्या कायदा अधिक कडक करण्याची गरज : आमदार शंकर जगताप

गोरक्षकांना संरक्षण व अवैध कत्तल थांबवण्यासाठी समित्या स्थापण्याची मागणी

मुंबई, : गोमातेला “राजमाते”चा दर्जा देत महाराष्ट्रात लागू असलेल्या गोवंश हत्या बंदी कायद्याची अधिक प्रभावी अंमलबजावणी व्हावी, तसेच या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना पाच वर्षांपर्यंत कठोर शिक्षा व एक लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात यावी, अशी ठाम मागणी आमदार शंकर जगताप यांनी महाराष्ट्र विधानसभेत आज (शुक्रवारी) औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.

शंकर जगताप यांनी स्पष्टपणे नमूद केले की, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ व त्यातील १९९५ आणि २०१५ मधील सुधारणा कायद्यानुसार संपूर्ण राज्यात गोवंश हत्या, वाहतूक, विक्री आणि अवैध व्यापारावर बंदी आहे. तरीही अनेक ठिकाणी या कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असून, घरांमध्ये अथवा गुप्त ठिकाणी बेकायदेशीर गोवंश कत्तल सुरू आहे.

viara vcc
viara vcc

कठोर शिक्षा व प्रभावी अंमलबजावणीची गरज ,गोरक्षकांना संरक्षण आणि पोलिसांना विशेष अधिकारांची मागणी,राज्यभर गस्त, तपासणी केंद्रे आणि समित्यांची आवश्यकता ,राज्याच्या सीमा, महामार्ग व अंतर्गत मार्गांवर वाहन तपासणी केंद्रांची स्थापना , पोलिस आणि पशुसंवर्धन विभागाने संयुक्तपणे नियमित गस्त आणि गुप्त तपासणी, गावपातळीवर जनतेचा सहभाग असलेली समिती स्थापन, अवैध कत्तल किंवा व्यापाराची माहिती देणाऱ्यांसाठी बक्षीस योजना, गोवंश रक्षणासाठी समर्पित भूमिका

राज्य सरकारने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायद्यात आवश्यक ते बदल करावेत, गोरक्षकांना संरक्षण द्यावे आणि जनतेच्या सहभागातून या पवित्र कार्यात यश मिळवावे, अशी मागणी करत जगताप यांनी आपला मुद्दा सभागृहात ठामपणे मांडला. त्यांच्या या सूचनांना अनेक आमदारांनी पाठिंबा दर्शविला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"