आधी केले मग सांगितले..

- बापू शिंदे सायकलस्वार, अविरत श्रमदान संस्था
परिपूर्णतेचा ध्यास घेतलेल्या व्यक्ती आधी केले मग सांगितले, या उक्तीप्रमाणेच काम करत राहतात. आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचे आहे, त्या क्षेत्रातील बारीकसारीक कामे ते आधी स्वतः शिकून घेतात. त्यातील बारकावे जाणून घेतात. त्यात येणाऱ्या अडचणी, त्यावर मिळणारी उत्तरे, त्यांना नेमकी माहिती असतात. त्यामुळेच ते आपल्या अनुयायांना नेमकेपणाने मार्गदर्शन करू शकतात. आपल्या मार्गदर्शकाला सगळ्या गोष्टींचे सखोल ज्ञान आहे, हे माहिती असल्यामुळे अनुयायी सुद्धा त्यांना मान देतात आणि आदर्श मानतात. त्यातूनच आधी केले मग सांगितले या उक्तीची यथार्थता स्पष्ट होते.

असा सगळा अनुभव आमदार महेशदादा लांडगे यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तींनी व्यक्त केला आहे. शेती, कुस्ती, आखाडा, कबड्डी, राजकारण, समाजकारण या व्यापातून आमदार महेशदादा लांडगे यांना निवांत वेळ कधीच मिळत नाही. पण कामाच्या धबडग्यातूनही वेगळं काही करायचं असेल तर दादांची आवड काय असेल, असा प्रश्न सामान्यपणे कोणालाही पडत असेलच. याचं सोपं उत्तर म्हणजे सायकलिंग. दादांना फार पूर्वीपासून सायकलिंगची आवड आहे.
दादांच्या सहवासातून घडलेले एक व्यक्तिमत्त्व म्हणजे सायकलस्वार बापू शिंदे. बापू यांनी महेशदादांबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. दादांबद्दल काय सांगू, मला मोजक्या शब्दात सांगता येत नाही, असे म्हणत त्यांनी दादांबद्दल सामान्य जनतेला ठाऊक नसलेल्या सायकलिंगच्या आठवणी सांगितल्या आहेत.
बापू शिंदे म्हणाले की, दादांचे धाकटे बंधू सचिन भैय्या लांडगे हे आमचे मित्र. आम्ही सायकल मित्रच्या माध्यमातून रोजच भेट असतो. अविरत श्रमदान या संस्थेच्या माध्यमातून दत्तगडावर पंचवीस हजार वृक्षारोपण केले. या उपक्रमाच्या निमित्ताने दादांचा आणि आमचा भरपूर वेळा संपर्क यायचा. आमच्या प्रत्येक उपक्रमाला दादांनी उत्साहाने मार्गदर्शन केले आहे. दादा वेळोवेळी या आमच्या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. कामाचा व्याप कितीही असला तरी निसर्गासाठी ते आवर्जून वेळ काढतात. मग ते शेती, शेतकरी आणि त्यांचे प्रश्न असा असो, किंवा सायकलिंग, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण इत्यादी पैकी काही असले तरी निसर्ग संरक्षण, संवर्धन या कामी महेशदादांचा पुढाकार कायमच राहिला आहे.
याच पद्धतीने इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानामध्ये आम्ही सर्वांनी दादांबरोबर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे. इंद्रायणीचे पावित्र्य टिकविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, हा दादांचा आग्रह कायमच होता. त्यानुसार वारंवार कार्यकर्त्यांना सूचना करून, प्रशासनाला हाताशी घेऊन दादांनी इंद्रायणी स्वच्छतेसाठी नेहमी पुढाकार घेतला आहे. दादांना देखील वृक्षारोपणाची आणि सायकलींची आवड आहे. त्यामुळे त्या माध्यमातून बऱ्याच वेळा दादा सोबत असायचे. यानिमित्ताने महेशदादांचा सहवास मला लाभला आहे. या सहवासातून त्यांची निसर्गाबद्दलची तळमळ, शेतीबद्दलचे प्रेम, कुस्तीविषयीची निष्ठा या गोष्टी आम्हाला जवळून अनुभवता आल्या आहेत.
रिव्हर सायकलच्या माध्यमातून दादांनी पूर्ण भारतभर नदी स्वच्छता संदेश पाठवला. दादांच्या अशा बऱ्याच सामाजिक कल्पनांमुळे दादांचा आम्हाला अभिमान आहे. भविष्यात आपल्या पिंपरी चिंचवड शहर आणि आसपासच्या परिसराचा आणखी उत्तम विकास आणि सुधारणा करायच्या असतील तर महेशदादा यांच्यासारखा नेता शहरातून आपण पुन्हा एकदा निवडून द्यायला हवा. दादांचा संपर्क स्थानिक पातळीवर प्रत्येक घराघरांमधून आहे, आणि ही बाब आता आमदारकीच्या पदावर असल्यामुळे आहे, असे नव्हे. तर दादांनी जेव्हा समाजकारणाचा वसा उचलला आहे, तेव्हापासून दादांनी प्रत्येक घरामधून आपल्या संपर्काला सुरुवात केली त्यामुळे दादांच्या पाठिशी मोठा जनसमुदाय उभा असलेला आपल्याला नेहमीच दिसेल. इतक्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदायाचा पाठिंबा दादांना नेहमीच असण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, दादा प्रत्येकाच्या अडीअडचणीत २४ तास कधीही उपलब्ध असतात. मग, अशा प्रकारे आपल्यासाठी झटणारा, जनतेवर इतके जीवापाड प्रेम करणारा माणूस दादांमध्ये दिसतो. त्यामुळे त्यांच्यासाठी उभे राहायची वेळ आली तर आम्ही सगळे कायमच उभे आहोत आणि ते पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने निवडून यायला हवेत, ही इच्छा आहे.