फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
विधानसभा २०२४

सच्चा हिंदू भक्त

सच्चा हिंदू भक्त
  • मिलिंद एकबोटे, हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष

राजकारण, समाजकारण, क्रिडा बरोबरच देशाची संस्कृती आणि हिन्दुत्वाचा स्वाभिमान वाढविण्याचे कार्य हिन्दु बाधवांमध्ये जोपासण्याचे काम आमदार महेश लांडगे सध्या करत आहेत. त्याना साथ देण्याची भूमिका आपल्या हिंदु बांधवांनी घ्यायला हवी, असे आवाहन हिंदुभक्त आणि समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद भाऊ एकबोटे यांनी केले आहे.

काही वर्षां पूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्णय हिंदु बांधवांनी घेतला. परंतु आपल्या स्वाभिमानी शंभू महाराजाच्या जयंतीला हिंदु बांधव वाढू या तीर्थस्थळी सामील होत नव्हते, ही बाब आमदार महेश लांडगे यांना सांगितली. त्यांनी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यासाठी चंग बांधला, त्यांनी विविध समाजकार्यात, लग्न समारंभ,कार्यक्रमाच्या ठिकाणी भाषणातून हिंदु बांधवांना आवाहन केले. त्यामुळे जयंती उत्सवाला बांधवांनी भरभरुन साथ दिली. आज पर्यंत हा जयंती उत्सव शानदार पणे साजरा केला जातो, याचे सर्व श्रेय आमदार महेश लांडगे यांना जाते, असे प्रांजळपणे एकबोटे यांनी सांगितले.

मिलिंद एकबोटे

पुण्यातील शनिवार वाड्यासमोरील थोरल्या शेख सल्ला दर्ग्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण मुस्लीम समाजाने केले होते. या ठिकाणी पाच मजली इमारत त्यांनी उभी केली होती, या इमारतीत मुस्लीम विद्यापीठ निर्माण केले जाणार होते. यामुळे हा परिसर अशांत बनणार होता. हिंदु बांधवांनी या अतिक्रमणविरोधी पुणे महानगरपालिकेत मोर्चा काढून पालिकेसाठी आंदोलन केले , या आंदोलनाला आमदार महेश लांडगे स्वःता उपस्थित होते. आमदार लांडगे यांनी आवेशपूर्ण भाषण केले ,जर महापालिकेने अतिक्रमण काढले नाही तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे त्याठिकाणी आम्हाला बुलडोझर लावावा लागेल, असा इशाराच महापालिका आयुक्तांना आमदार लांडगे यांनी दिला.

यामुळे बांधवाना पाठबळ मिळाले,आणि महापालिकेने देखील कारवाई करून परिसरातील शांतता बिघडू दिली नाही ,असा हिंदुत्वाचा कणखरपणा आमदार लांडगे यांच्यात आहे असे एकबोटे यांनी स्पष्ट केले. राज्यमाता गोमाता प्राचीन काळापासून गाईचे अनन्य साधारण महत्त्व आहे वैदिक काळापासून गाईचे धार्मिक वैज्ञानिक व आर्थिक महत्त्व विचारात घेऊन त्यांना कामधेनू संबोधण्यात येते.

गोरक्षणाचे बहुमोल कार्य
युर्वेद चिकित्सा सेंद्रिय शेती गोमुत्राचे महत्त्व आहे देशी गाईच्या संख्येत होणारी घट चिंताजनक आहे. त्यामुळे आपण आळंदी मध्ये गो संरक्षणासाठी उपोषणास बसलो होतो ,उपोषणाच्या ठिकाणी आमदार महेश लांडगे यांनी भेट दिली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधला आणि उपोषण कर्त्यांच्या मागणी संदर्भात चर्चा केली. गोमातेचे संरक्षण करावे आणि देशी गाईच्या पालनपोषणासाठी सरकारने अन्य राज्यांप्रमाणे सानुग्रह अनुदान द्यावे लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडकी गोमाता योजना राबवून देशी गायीचे संवर्धन करावे, गोरक्षण करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून होणारा त्रास थांबवावा अशी मागणी आमदार लांडगे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली .आमदार लांडगे यांच्या मागणीला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आपले उपोषण स्थगित करण्यात आले असे मिलिंद एकबोटे यांनी स्पष्ट केले. आमदार लांडगे यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्ती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पूर्ण केली .या आश्वासनामुळेच राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशी गाईंना राज्यमाता गोमाता म्हणून जाहीर केले आहे.

गो संरक्षणासाठी हिंदू बांधवांनी वेळोवेळी आंदोलने केली या आंदोलनात सहभाग घेतलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून त्रास दिला जात असे, आमदार लांडगे यांनी या कार्यकर्त्यांना सहकार्य केल्याने कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढले .गो संरक्षण करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असे मात्र लांडगे यांनी समाजसेवा म्हणून सर्व पातळीवर मदत केली. गोशाळा चालवण्यासाठी चारा महत्त्वाचा असतो, महागाईच्या कारणामुळे गोशाळा चालू ठेवणे अडचणीचे असते मात्र लांडगे नेहमीच मदतीचा हात पुढे केला .चिखली येथे पाच एकर जागेत गोशाळा उभारण्याचे कार्य लांडगे यांनी हाती घेतले आहे. याशिवाय देशी खिल्लारी बैलांचे प्रदर्शन त्यांनी भरून आपली संस्कृती आणि धर्मभावना वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. गो संरक्षणासाठी आमदार महेश लांडगे सारखे समाजसुधारक निर्माण होणे गरजेचे आहे अशी भावना माझी आहे, असे एकबोटे यांनी स्पष्ट केले.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"