लाहोर मधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम भारतीय लष्कराने केली उध्वस्त !

भारतातील 15 लष्करी ठिकाणांवर हल्ले
नवी दिल्ली : भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानच्या लाहोर जवळील एअर डिफेन्स सिस्टीम उध्वस्त केल्याचे संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात नमूद केले आहे .पाकिस्तानकडून होणाऱ्या कारवायांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा स्पष्ट इशारा निवेदनात देण्यात आला आहे .पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उत्तरा दाखल भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केले .भारताने पाकिस्तान मधील दहशतवादी तळ बुधवारी केलेल्या एयर स्ट्राइक मध्ये उध्वस्त केले .
गुरुवारी सकाळच्या कारवाईत पाकिस्तानात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या एअर डिफेन्स सिस्टीम, रडार सिस्टीमला भारतीय हवाई दलाने लक्ष केल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे .पाकिस्तान ज्या प्रकारे कारवाई करेल त्याच पद्धतीने भारताकडून उत्तर दिले जाईल असा इशारा भारताकडून देण्यात आला आहे .भारतीय लष्कराच्या या कारवाईमुळे पाकिस्तानच्या हवाई कारवाया मोठ्या प्रमाणावर थोपवून धरण्यास मदत होणार आहे. भारताने सात मे रोजी ऑपरेशन सिंदूर ची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते की ,आमची कारवाई पूर्णपणे दहशतवादी तळांवर केंद्रित असून अन्य कोणत्याही ठिकाणी हल्ला केला नाही .परंतु पाकिस्तानने कारवाई केल्यास त्या सडेतोड उत्तर दिले जाईल अशी भूमिका मांडली होती.

पाकिस्तानकडून सात व आठ मे रोजी मध्यरात्री उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी ठिकाणांवर हल्ले करण्याचे प्रयत्न झाले. भारतातील अवंतीपुरा ,श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंदर, लुधियाना, आदमपूर ,भटिंडा, चंदीगड, नाल ,फलोदी ,उत्तरलाई आणि भुज या 15 शहरांचा यात समावेश आहे .पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून या शहरांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. इंटिग्रेटेड काउंटर यू ए एस ग्रीड आणि एअर डिफेन्स सिस्टीमच्या मदतीने पाकिस्तानचे हे प्रयत्न हाणून पाडण्यात आले .
व क्षेपणास्त्राच्या अवशेषावरून स्पष्ट होत आहे की, हे पाकिस्तान ने केले आहेत अशी माहिती संरक्षण विभागाच्या निवेदनात देण्यात आली आहे. पाकिस्तानने सीमावर्ती भागात 16 निरपराध नागरिकांचा हकनाक बळी गेला आहे .त्यात तीन महिला व पाच लहान मुलांचा समावेश होता .पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्याला भारताने प्रत्युत्तर देऊन इशारा दिला आहे .भारताने स्पष्ट केले आहे की तणाव न वाढविण्यासाठी बांधील तेव्हाच आहोत, जेव्हा पाकिस्तानी लष्कराकडून या गोष्टीचे पालन केले जाईल असा स्पष्ट इशारा दिला आहे.