पाकिस्तानच्या सहा एअर बेसवर भारताचे हल्ले!

पाकिस्तानने मध्यरात्री केला हाय स्पीड हल्ला
नवी दिल्ली : भारताने पहेलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देताना ऑपरेशन सिंदूर राबवताना पाकिस्तान मधील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले आहेत. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान मध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गेले तीन दिवस पाकिस्तानी सेना भारतावर ड्रोन, मिसाईल आणि विमान हल्ले करत आहे .यातच पाकिस्तानने शुक्रवारी पहाटे एक वाजून 40 मिनिटांनी पंजाब मधील हवाई तळावर हल्ले केले .हवाई तळावरील रुग्णालयांना देखील लक्ष केले. भारताने प्रतिहल्ला करुन पाकिस्तानच्या सहा एअर बेसचे मोठे नुकसान केले.
लाहोर मधून नागरी विमानांच्या आडून पाकने हल्ले केले आहेत असे परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली, यावेळी कर्नल सोफिया कुरेशी यांनी ही माहिती दिली. पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांना लक्ष करूनही भारताने संयम राखला आहे. पाकिस्तानने पश्चिम भागावर एकसारखे आक्रमण सुरू ठेवले आहे . ड्रोन्स लॉन्ग ,रेंज वेपन्स ,लढाऊ विमानांचा वापर करत भारतावर हल्ले केले आहेत .या हल्ल्याला भारताने चोख प्रतिउत्तर दिले . टेक्निकली इन्स्टॉलेशन, कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि रडारसाइट्स हत्यार भंडारवर निशाणा केले.
सहा एअर बेसवर भारताचे हल्ले
भारताने रफीकी मुरीत, चकलाला, रहिमियान खान, सुकूर आणि सोनिया या पाकिस्तानच्या ठिकाणावर एअरलान्स द्वारे प्रतिहल्ला केला. कोटचा एअर बेसही टार्गेट करण्यात आला .भारताने ही कारवाई करताना कमीत कमी नुकसान होईल याची खबरदारी घेतली आहे असे सोफिया कुरेशी यांनी सांगितले. पाकिस्तानने सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले असून भारतीय लष्कराचे एस 400 आणि ब्रम्हेसचा साठा पूर्णपणे सुरक्षित आहे. भारताचे सर्व एअर बेस सुरक्षित असून पाकिस्तान कडून करण्यात आलेले दावे पूर्णपणे खोटे आहेत. भारतीय सैन्याने पाकिस्तान सैन्याचे बरेच मोठे नुकसान केले आहे. पाकिस्तान खोट्या बातम्या पसरवत असून शिरसा ,आदमपूर हवाई तळांना झालेल्या नुकसानीचे दावे पूर्णपणे खोटे आहेत, असे परराष्ट्र सचिव म्हणाले
