जनतेच्या प्रश्नांसाठी सत्तेलाही भिडणारा नेता

भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे म्हणजे भिडस्त, परखड, सडेतोड असे नेतृत्व आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनातील भाषण असो किंवा राजकीय व्यासपीठावरील भाषण असून अत्यंत सडेतोडपणे, संवेदनशीलपणे विषय मांडणे हा त्यांचा गुण भावणारा आहे. तसेच त्यांचे बलस्थान आहे, असे वाटते.
गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये महेश दादा लांडगे यांनी विधिमंडळाचे अधिवेशन गाजवलेला आहे. त्यामध्ये अनेक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वाढलेली गुन्हेगारी, अनधिकृत बांधकाम नियमितीकरन करण्याचा प्रश्न असेल, समाविष्ट गावांच्या विकासाचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, इंद्रायणी नदीचे प्रदूषण असेल, उपयोग करता शुल्क असेल, मराठा आरक्षण, हिंदुत्व, महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज यांचा विषय असेल किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, बैलगाडा शर्यत असे विविध प्रकारचे सर्वाधिक प्रश्न मांडून त्यांनी जनतेचा आवाज बुलंद केला आहे. त्यापैकी उपयोग कर्त शुल्क, अनधिकृत बांधकामे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरील चर्चेत महेश दादांनी थेट विरोधकांविरोधात षड्डू ठोकल्याचं आपण पाहिले आहे. त्यातून जनतेविषयी असणारी कणव, प्रेम दिसून येते.
महेश दादांची अनेक भाषणे आहेत. मात्र, त्यापैकी गाजलेली आणि जनतेच्या मनात असलेली भाषणे या लेखामध्ये देणार आहोत. वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चर्चा होत होती. त्यावेळेस समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि पुढे औरंगजेब यांच्या विषयी छोटसं विधान केलं होतं त्यावर सभागृहातच महेश दादा भडकले होते. थेट ते आझमीच्या अंगावर धावून गेले. औरंगजेबाचा उल्लेख होताच महेशदादा यांचा पारा चढला. त्यांनी आझमी यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.
संतापून महेशदादा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय म्हणतात आणि औरंगजेबाला गळ्याला का लावता रे…’ तरीही शाब्दिक युद्ध सुरू राहिले म्हणून महेशदादांनी थेट सभागृहातच आजमीना आव्हान दिले. त्यातून त्यांचे हिंदुत्व प्रेम, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असणारी आस्था सभागृहांने आणि उभ्या महाराष्ट्राने अनुभवला.
विधिमंडळ अधिवेशनातील चर्चेत पीठासन अधिकारी राहुल नार्वेकर यांनी महेशदादांना बोलण्याची संधी दिली. त्यावेळी संभाजी भिडे यांच्या विधानावरून चर्चा सुरू होती. त्यावेळी आझमी आणि महेश दादांमध्ये खडाजंगी झाली. संतापून महेश दादा म्हणाले, ‘छत्रपती शिवरायांना मानता आणि औरंगजेबाला गळ्याला का लावता. या सभागृहामध्ये प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो आणि जर जो मानत नसेल तर त्यांनी हात वर करा? आपण जर शिवाजी महाराजांना मानतोय तर औरंगजेबाचा संबंध काय? अफजलखानाचा संबंध काय. तुम्ही या महाराष्ट्रात राहता, छत्रपती शिवाजी महाराजांना मानता तर इतरांचा संबंध काय? ज्यांनी आमच्या राजाला मारले, प्रजेला छळले, धर्म बाटविला.
अध्यक्ष महोदय आणि गृहमंत्री महोदय अशा विकृतींना थांबवायला पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जे छत्रपती शिवरायांच्या, संभाजी महाराजांच्या विरोधात आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.
त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देताना म्हणाले, शिवाजी महाराजांना जो कोणी विरोध करत असेल. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. औरंगजेब हे शासक होते. मात्र, ते हिरो नव्हते. संभाजी महाराजांचा अनन्वित छळ करून, अत्याचार करून त्यांना ठार केले. हे महाराष्ट्र हा देश कधीच विसरणार नाही. त्यामुळे या देशात, सभागृहात आणि महाराष्ट्रामध्ये औरंगजेब महिमा मंडळ कधीच सहन केले जाणार नाही
उपयोग करता शुल्काच्या मुद्द्यावर महेश दादा मंत्र्यांनाच भिडले!
आणखी एक महत्त्वाचा किस्सा आणि प्रसंग सांगावासा वाटतो. तो म्हणजे उपयोग कर्ता शुल्कावर चर्चा विधिमंडळामध्ये चर्चा सुरू होती आणि पिंपरी चिंचवड मधील प्रश्नाबाबत वेळ मिळत नाही, सदस्यांना बोलायला वेळ दिला जात नव्हता, मात्र तरीही महेशदादा सभागृहातून हटले नाहीत. जेव्हा वेळ मिळाला. त्यावेळेस त्यांनी थेट स्वकीयांवरही हल्ला चढविला टीका केली. नाराजी व्यक्त केली. महेश दादा लांडगे म्हणाले, पहिल्या लक्षवेधीला दीड तास दिला. दुसऱ्या लक्षवेधीलाही वेळ मिळाला. मात्र आमच्या लक्षवेधीला वेळ मिळणार की नाही. आम्ही काय इथे खेळायला आलोय का? त्यावर पिठासन अधिकारी यांनी आपण प्रश्न विचारावा, अशी विनंती केली.
महेश दादा म्हणाले, आम्ही इथे प्रश्न मांडण्यासाठी काही तासांपासून बसलो आहोत, वेळ कधी मिळणार.’ त्यावर अध्यक्षांनी आपण विषय मांडावा, अशी सूचना केली. महेश दादा लांडगे म्हणाले, आम्हाला आमच्या मतदारांनी प्रश्न मांडण्यासाठी निवडून दिले आहे, या सभागृहात पाठवले आहे. इतरांचे प्रश्न ऐकून घ्यायला नव्हे तर आमचेही प्रश्न मांडायला संधी दिली आहे. आमचे प्रश्न ऐकून घ्यावेत. ज्या लोकांनी पिंपरी चिंचवड शहरातील ज्या लोकांनी प्रामाणिक प्रामाणिकपणे कर भरला आहे. त्यांच्यावर महापालिकेने उपयोग करता शुल्क लादले आहे. या शुल्काबाबत २०१९ मध्ये निर्णय झाला. मात्र त्यानंतर चार वर्षांनी त्यावर अंमलबजावणी झाली. याबाबत नागरिकांना कोणती कल्पना न देता थेटपणे हक्क लादण्यात आलेला आहे. त्यावर शासनाने निर्णय घेणे अपेक्षित आहे व हा उपयोग करता शुल्क रद्द करावे, अशी मागणी आहे. त्यावर उत्तर देताना संसदीय कार्यमंत्री उदय सामंत यांनी महेश दादांचे कौतुक केले. व त्यांनी लक्षवेधीला वेळ का लागला, हे अत्यंत संयमाने सांगितले.
उदय सामंत म्हणाले, ‘महेशदादांनी ज्या भावना व्यक्त केल्या. रास्त आहेत. ते पैलवान आहेत. त्यामुळे मंत्री म्हणून मला सकारात्मक उत्तर द्यावे, लागणार आहे. उपयोग करता शुल्कविषयी स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिलेला निर्णय स्थगित ठेवण्यात येत आहे. चार वर्षानंतर एखाद्या कराची वसुली करणे अन्यायकारक आहे, असे म्हणून त्यांनी २०१९ पासून चा उपयोग करता शुल्क रद्द केले.
अशांना तर ठेचून मारायला हवे
सामाजिक जीवनामध्ये महेश दादांनी अनेक भाषणे केले आहेत आणि ती गाजली आहेत. बदलापूरच्या घटनेवर एका कार्यक्रमात बोलताना महेशदादा आक्रमक झाले होते. महेशदादा म्हणाले, बदलापूर सारख्या घटना घडत असतील तर त्या चिंताजनक आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कोण कुठल्या कोणत्या जाती, धर्माचा असेल, हे न पाहता आपली, बहीण, माता यावर जर कोणी अन्याय करत असेल, तर सगळ्यांनी विचार बाजूला ठेवायचा एकत्र यायचं. तुम्ही माझ्याबरोबर चला आपण अशा वृत्तीने ठेचून काढू.”
रात्री पाऊण वाजता केलेलं भाषण
विधिमंडळ अधिवेशनातील २९३व्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना महेश दादा आक्रमक झाले होते. कारण त्यावेळी सभागृहात पावणे एक वाजले होते आणि मोजकेच प्रतिनिधी सभागृहात उपस्थित होते. मोजकेच प्रतिनिधी आमदार आणि त्या प्रश्नासंदर्भातील मंत्री सभागृहात उपस्थित होते. वेळ वेळ होऊनही केवळ जनतेच्या प्रश्नांसाठी भूमिका मांडण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत महेशदादा सभागृहात उपस्थित होते. यातून त्यांचे जनतेच्या प्रश्नांविषयी असणारा जिव्हाळा दिसून येतो.
महेश दादा म्हणाले, ‘गेल्या तीन दिवसांपासून मत मांडण्यासाठी प्रतिक्षित आहेत. या ठिकाणी मोजकेच आमदार, उत्तर देणारे कॅबिनेटमंत्री उपस्थित आहेत. तर ज्यांनी विषयाची सुरुवात केली, असे काही लोकं आता जेवण करू झोपले आहेत. पण, आम्हाला या महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे. कुणी मराठा असो, कोणी ओबीसी असो सर्वजण एकत्र राहायला हवेत. मात्र, काही लोक जाणीवपूर्वक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहात .जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. तो आपण सर्वांनी हाणून पडायला हवा, असे मला वाटते. आपले नेते देवेंद्रजी फडणवीस यांचे किंवा कोणत्याही नेत्याचे एखादे स्टेटमेंट दाखवा की जे मराठ्यांविरोधात आहे. मात्र, काही लोक संभ्रम निर्माण करून तेढ निर्माण करत आहेत. अशा यंत्रणेपासून आपण सावध राहायला हवे. सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत, असे मला वाटते.
एकूणच मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, शास्ती कराचा मुद्दा असेल, हिंदुत्वाचा मुद्दा असेल किंवा विविध सामाजिक प्रश्न, महिला अत्याचारांचे प्रश्न असतील अशा विविध मुद्द्यांवर महेशदादा यांनी संधी मिळाल्यानंतर अनेकदा सभागृह गाजवला आहे तसेच बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यांवर त्यांनी अनेक वेळा सभागृहांमध्ये भाषण केले. एवढेच नव्हे तर, अधिवेशनामध्ये थेट बैलगाडा घेऊन जाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना आणि निकाल लागल्यानंतर त्याच वेळेस त्यांनी प्रतिक्रिया म्हणून थेट सर्वोच्च न्यायालय समोरच्या हिरवळीवर शड्डू ठोकला होता.