अहमदाबाद विमान अपघात; सुदैवाने एक प्रवासी बचावला!

टाटा ग्रुप कडून दुर्घटनेत मरण पावलेल्या नातेवाईकांना एक कोटीची मदत
अहमदाबाद : गुजरात मधील अहमदाबादच्या सरदार वल्लभ भाई पटेल विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण घेतलेले विमान अवघ्या सात मिनिटात दुर्घटनाग्रस्त झाले .या विमानातील सर्वच्या सर्व 242 प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे . असोसिएट प्रेस एपी वृत्तसंस्थेने ही साहिती दिली आहे .विशेष म्हणजे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाने हे सुद्धा प्रवास करत होते.
एअर इंडियाचे 787 हे विमान अहमदाबाद वरून लंडन कडे निघाले होते दुपारी एक वाजून 31 मिनिटांनी विमानाने लंडनसाठी उड्डाण केल्यानंतर अवघ्या सात मिनिटात हे विमान कोसळले . विमानाने हवेत टेकऑफ केल्यानंतर जवळच असलेल्या मेघानी नगर या दाट लोकवस्तीच्या भागात हे विमान कोसळले. विमानात 12 कृ मेंबर्स आणि 230 प्रवासी प्रवास करत होते .एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानात 169 भारतीय ,53 ब्रिटिश नागरिक ,7 पोर्तुगालचे , कॅनडाचा एक नागरिक प्रवास करत होता अशी माहिती समोर आली आहे .

या दुर्घटनेत अवघा देश शौकसागरात बुडाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. तर ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे विमानाचा अपघात इतका भयंकर होता की अहमदाबादच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर हे विमान कोसळले तेथील होस्टेलवर जेवण करणाऱ्या भावी डॉक्टरांना भरल्या ताटावरून उठवण्याचे काम या दुर्घटनेने केलं . दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने व बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीला सुरुवात केली.
अहमदाबादचे पोलीस आयुक्त जीएस मलिक यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना माहिती दिली आहे की एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात 11 या शीट वरील प्रवासी बचावला आहे या प्रवाशाचे नाव विश्वेश कुमार रमेश असे आहे या बचावलेल्या प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या विमान अपघातात किती जणांचा मृत्यू झाला हे सध्या सांगता येणार नाही असे ते म्हणाले. निवासी भागात विमान क्रॅश झाल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत
.गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले .एअर इंडियाच्या विमान दुर्घट नेनंतर टाटा ग्रुप कडूनही दुःख व्यक्त करण्यात येत आहे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत आणि सामाजिक जाणीव ठेवून टाटा ग्रुपने विमान दुर्घटनेतील जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे .तसेच जखमींचा वैद्यकीय खर्च देखील टाटा ग्रुप कडून करण्यात येणार आहे तसेच विमान कोसळलेल्या अहमदाबाद मधील बीजे मेडिकल कॉलेजच्या वस्तीगृहाच्या बांधकामात मदत करण्याचे आश्वासने टाटा ग्रुपचे प्रमुख एन चंद्रशेखरन यांच्याकडून देण्यात आले आहे