फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या निवडणूक रणसंग्रामातून ‘आप’ची माघार

महाराष्ट्राच्या निवडणूक रणसंग्रामातून ‘आप’ची माघार

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अरविंद केजरीवालांचा पक्ष आम आदमी पार्टी उमेदवार देणार नसून दिल्ली विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करणार आहे. भाजपाविरोधी मतांमध्ये फूट पडू नये यासाठी महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणूक न लढण्याचा पक्षनेतृत्वाचा विचार आहे.

इंडिया आघाडी मजबूत करणे, पक्षसंघटना बळकट करणे यावर आप पक्षाकडून भर दिला जात आहे. पक्षाच्या महाराष्ट्र कार्यकारिणीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे परंतु पक्षाच्या वरिष्ठांकडून निवडणूक न लढण्याचे संकेत मिळत आहेत.

आम आदमी पक्षाचे लक्ष दिल्लीवर आहे, महाराष्ट्रातील मतदारांच्या मनात आणखी संभ्रम निर्माण करायचा नाही. ज्यामुळे भाजपविरोधी मतांचे विभाजन होऊ शकते, असे आप नेत्यांना वाटते. ११ ऑक्टोबर रोजी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) आणि राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी दिल्ली निवडणुकीसाठी पक्षाच्या मुख्यालयात बूथ तयारीसाठी एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला पक्षाचे राज्य ते बुथ स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते.

संदीप पाठक यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी लढवणार नाही. एक किंवा दोन विधानसभेच्या जागांसाठी वाटाघाटी करणं व्यर्थ असल्याचं पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"