ताम्हिणी घाटात अपघातात पाच ठार

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पुणे, प्रतिनिधी : ताम्हिणी घाटाजवळ (Tamhini Ghat) एका धोकादायक वळणावर बसला भीषण अपघात झाला आहे. बस दरीत कोसळून पाच जण ठार झाले आहेत.
बसमधील १२ ते १३ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. चाकण इथून महाडला लग्नासाठी जात असताना आज सकाळच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. बसमध्ये ४० च्या आसपास प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ भीषण अपघात घडल्याची घटना उघडकीस आली आहे. एका प्रवासी ट्रॅव्हल्सचा ताबा सुटल्याने ती पलटी झाली असून या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ट्रॅव्हल्समध्ये काही प्रवासी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.