नवि दिल्ली – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने आज अंतरिम जामीन मंजूर केला आहे. . त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, अरविंद केजरीवाल यांना हा अंतरिम जामीन ईडीने अटक केलेल्या प्रकरणात दिला आहे.
काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना सध्या तरी तुरुंगातच राहावं लागणार आहे. अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून २१ मे रोजी अटक करण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत अटकेची कारवाई बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, केजरीवाल यांना पीएमएलए कायद्यानुसार ईडीने अटक केलेल्या प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर दिला आहे. पण सध्या केजरीवाल सीबीआयच्या कोठडीत आहेत. त्यामुळे अंतरिम जामीन मंजूर केला असला तरी त्यांना सध्या तरी तुरुंगातच राहावं लागणार आहे..
त्यानंतर उच्च न्यायालयात ईडीने केजरीवालांच्या जामिनास विरोध केला होता. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. यामुळे अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाच याचिका दाखल केली होती.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मात्र, अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून झालेल्या अटकेचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्यात आलं आहे. ईडीने केलेल्या अटकेच्या कारवाईला आव्हान देणाऱ्या याचिकेचं प्रकरणाची सुनावणी आता तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणार आहे. ही सुनावणी होऊपर्यंत अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, सध्या ते सीबीआयच्या कोठडीत आहेत. त्यामुळे त्यांना सध्या तरी तुरुंगातच राहावं लागणार आहे.