फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
Live news उद्योग सामाजिक

सरन्याधिशांनी वकिलांना सुनावले

सरन्याधिशांनी वकिलांना सुनावले

नवी दिल्ली : देशात विधीविषय नियमन करणाऱ्या बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेसंदर्भात ही याचिका करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या खंडपिठाचे प्रमुख चंद्रचूड होते.
वकील होण्यासाठीचे पासिंग मार्क कमी करा; थेट सरन्यायाधीशांसमोर याचिका! चंद्रचूड म्हणाले, ‘जरा अभ्यास..’
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ऑल इंडिया बार एक्झामची (एआयबीई) कट ऑफ लिस्ट कमी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. भारतीय कायद्यासंदर्भातील क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींची गुणवत्ता आणि दर्जा कायम राखणं गरजेचं असल्याचंही न्यायालयाने अधोरेखित केलं. या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या खंडपिठाचे प्रमुख देशाचे सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड हे होते. चंद्रचडू यांनी अशाप्रकारे कट ऑफ कमी केली तर त्याचा नकारात्मक परिणाम ज्या दर्जाचे वकील या क्षेत्रात येतील त्यावर होईल, असं निरिक्षक नोंदवलं. सध्या जनरल म्हणजेच ओपन कॅटेगरीमधील उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी किमान 45 टक्के गुण आवश्यक असून एससी आणि एसटी आरक्षणाअंतर्गत येणाऱ्या उमेदवारांसाठी ही मर्यादा 40 टक्के इतकी आहे.

सरन्याधीश काय म्हणाले?
याचिकाकर्त्याला सरन्यायाधिशांना, “जरा अभ्यास कर” असा सल्ला दिला. तसेच या परीक्षेसाठी पुरेशी तयारी करणं गरजेचं असल्याचंही चंद्रचूड म्हणाले. न्यायालयाच्या निर्णयामुळे केवळ पात्र व्यक्तींनाच बारमध्ये प्रवेश दिला जाईल. या निर्णयामुळे भारतातील कायदेशीर सेवांच्या गुणवत्तेचे संरक्षण करण्याची आणि त्यामध्ये दर्जेदार व्यक्तीच प्रवेश करतील यासंदर्भातील न्यायालयीन यंत्रणेचा प्रयत्न दिसून येत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"