बारावीच्या परीक्षेचा निकाल 91.88%;कोकण विभागातील निकाल सर्वात जादा 96.74%

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 दरम्यान घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 91.88% इतका लागला असून राज्यातील कोकण विभागातील निकाल सर्वात जादा 96.74% इतका लागला आहे ‘मंडळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बारावीला 91.88% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
बारावीच्या परीक्षेसाठी 14 लाख 27 हजार 85 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती ,यापैकी 14 लाख 17 हजार 969 जण प्रत्यक्ष परीक्षेला बसले. परीक्षेला बसलेल्यापैकी 13 लाख 2873 जण उत्तीर्ण झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वाधिक उत्तीर्ण विद्यार्थी संख्या कोकण विभागा मध्येच आहे .सर्वात कमी उत्तीर्ण विद्यार्थी संख्या लातूर विभागात आहे. कोकण विभागाचा निकाल 96.74% एवढा लागला असून लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी 89.46% एवढा लागला आहे. राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजी नगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नऊ विभागातून बारावीच्या परीक्षेला विद्यार्थी बसले होते यंदा सहा लाख 25 हजार 901 मुली तर सहा लाख 76 हजार 972 मुले बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
मुलीच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 94.58% तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51% आहे. विभाग वार निकाल कोकण 96.74 कोल्हापूर 93.64% , मुंबई 92.93% , संभाजीनगर 92.24% , अमरावती 91.43% , पुणे 91.32%,नाशिक 91.31% , नागपूर 90.52% , लातूर 89.46% .

कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल
कला 80.52%, वाणिज्य 92.68%, विज्ञान 97.35%, व्यवसाय अभ्यासक्रम 83.03%, आयटीआय 82.03%. बारावीच्या परीक्षेत 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 49 हजार 932 इतकी आहे. प्रथम श्रेणी आणि त्याच्यापुढे गुण मिळवलेले 4 लाख सात हजार 438 विद्यार्थी आहेत. तृतीय श्रेणी 5 लाख 80 हजार 902 विद्यार्थी आहेत.